
शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा
आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे, ‘तुमचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी ठेवले आहेत का? दुसऱ्यांचे पक्ष कशाला फोडता?” असा खरमरीत सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपसह आरएसएसवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी यावर भाष्य केले.
भाजपकडून इतरांचे पक्ष का फोडले जातात? असा सवाल यावेळी शर्मिला ठाकरेंनी उपस्थित केला. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार, 14 जून) घेतलेल्या खासदारांच्या बैठकीवरून बोलताना त्या म्हणाल्या, “ठाकरे गटातील काहीजण कालच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पाच – सहा जण नव्हते, म्हणजे ते गेले असे नाही. बैठकीला हजार असलेले लोक जाणारच नाहीत, असाही मानायचं कारण नाही. मला याचा चांगला अनुभव आहे. माझ्या पक्षातील काही लोक जातील, असं वाटल्यावर मी त्यांना फोन करायचे. तेव्हा ‘आम्ही इकडेच आहोत‘ असं ते म्हणायचे. दुसऱ्या क्षणाला ते चॅनेलवर दुसऱ्या पक्षात जाताना दिसायचे” असे त्या यावेळी म्हणाल्या.
कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल होणार? रोहित पवारांच्या आंदोलनादरम्यान सरकारकडून मोठे संकेत
त्या पुढे म्हणाल्या, “भाजपला इतरांचे पक्ष फोडणे, एवढंच काम करायचे आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा तुमची मुलं मोठीं कराना … 12 वर्ष सत्तेत आहात ना, तर किमान स्वतःचे कार्यकर्ते तरी मोठे करा. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप मध्ये चांगली मुलं आहेत, होती. त्यांनी दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का? त्यांनी तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला. इकडे उद्धवचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो आणि नवीन कार्यकर्ते तयार केले,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?