Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
पण विसर्जनाच्या वेळी एक प्रश्न सगळ्यांनाच पडतो – बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मागे वळून पाहावं की नाही? मोठी माणसं नेहमी सांगतात की विसर्जन झाल्यावर मागे वळून बघू नका. पण असं का सांगतात? यामागे शास्त्र आहे की फक्त एक समज आहे? चला आज हेच जाणून घेऊया. Ganesh Visarjan:
पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भावनिक. बाप्पा 10 दिवस आपल्या घरात असतो. आपण त्याची रोज पूजा करतो, त्याच्याशी बोलतो. तो आपल्या घरातलाच एक झाला असतो. त्याला पाण्यात निरोप देताना मनात खूप वाईट वाटतं. जर आपण विसर्जनानंतर परत मागे वळून पाहिलं तर तो मोह सुटत नाही. मनात सारखं वाटत राहतं की बाप्पाला अजून थोडा वेळ ठेवूया.म्हणून मोठी माणसं सांगतात की एकदा निरोप दिला की मागे वळू नका. मोहात अडकू नका. बाप्पा गेलाय हे मनाला समजवा आणि पुढच्या वर्षी तो परत येणार या आनंदात घरी जा.
दुसरी एक मान्यता अशी आहे की, बाप्पा जाताना आपल्या घरातलं दुःख, अडचणी, संकटं सगळं सोबत घेऊन जातो. तो विघ्नहर्ता आहे. आपली सगळी विघ्नं तो दूर करतो.जर आपण विसर्जनानंतर मागे वळून पाहिलं तर आपण त्या दुःखांना परत बोलावतो असं मानलं जातं. म्हणून सांगतात की बाप्पा गेल्यावर मागे बघू नका, सरळ घरी जा. जेणेकरून घरातली नकारात्मकता पण त्याच्यासोबत जाईल आणि नवीन आशा घेऊन तुम्ही घरी याल.
शास्त्रात काय सांगितलं आहे?खरं सांगायचं तर कोणत्याही मोठ्या ग्रंथात असं लिहिलेलं नाही की मागे वळून पाहिलं तर पाप लागेल किंवा दोष लागेल. हा नियम नाही, ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथा आहे.जसं आपण एखाद्या पाहुण्याला स्टेशनवर सोडायला जातो आणि तो गेल्यावर जास्त वेळ तिथे उभे राहत नाही, तसंच आहे हे. एकदा निरोप दिला की विषय संपला. मनात त्याचाच विचार करत बसू नका.
विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मनोभावे उत्तरपूजा करा. त्याला आवडणारा नैवेद्य दाखवा, आरती करा. विसर्जन करताना “पुढच्या वर्षी लवकर या” असं मनापासून म्हणा.बाप्पा पाण्यात विसर्जित केल्यानंतर नमस्कार करा आणि मागे न वळता घरी या. घरी आल्यावर हातपाय धुवा आणि घरातली थोडी साफसफाई करा. असं मानतात की बाप्पा गेल्यावर घरात पुन्हा सकारात्मकता येते.शेवटी काय, हा श्रद्धेचा विषय आहे. मागे वळून पाहणं किंवा न पाहणं याने बाप्पा रागावत नाही. तो तर आपला लाडका आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे निरोप देताना मनात भाव असला पाहिजे. बाप्पा जाताना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन जातो, हाच विचार मनात ठेवा.






