Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Buddha : दु:ख का होतं ? याची नेमकी कारणं काय ? गौतम बुद्धांनी सांगितली चार आर्यसत्ये

आनंद, राग, दुख हसू या मानवी आयुष्याचे विविध भाव आहेत. मात्र अनेकदा आपलं जास्त लक्ष हे दु:खावर असतं. याबाबतच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटक या ग्रंथात चार आर्यसत्ये सांगितली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 02:12 PM
Gautam Buddha : दु:ख का होतं ? याची नेमकी कारणं काय ? गौतम बुद्धांनी सांगितली चार आर्यसत्ये
Follow Us
Follow Us:
  • दुःख आणि त्याचे स्वरूप काय ?
  • दुःखाचे कारण काय ?
  •  दुःखाचे निराकरण कसं करता येईल ?
आनंद, राग, दुख हसू या मानवी आयुष्याचे विविध भाव आहेत. मात्र अनेकदा आपलं जास्त लक्ष हे दु:खावर असतं. याबाबतच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटक या ग्रंथात चार आर्यसत्ये सांगितली आहे. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांनी दु:ख का होतं ? त्याची कारणं काय हे सांगितलं आहे.
बुद्ध म्हणतात की,समाधानी जगण्यासाठीचा योग्य मार्ग ही चार पायाभूत आर्यसत्यं आहेत. व्याधी आणि मृत्यू या शरीराशी निगडित गोष्टी दुःखकारक असल्या तरी त्या अपरिहार्य आहे. जन्माला आलेला माणूस हा कधीना कधी जाणार असतो. त्याचा त्रास करुन घेण्यापेक्षा स्विकार केला तर दुखाची तीव्रता कमी होते. शरीराप्रमाणे मनाची देखील दुखणी असतात. अनेक मनाविरुद्ध गोष्टी घडतात आणि कितीही वाटत असलं तरी आपल्याला त्या बदलता येत नाही अशावेळी जे बदलता येत नाही ते स्विकारणं महत्वाचं आहे. बुद्ध म्हणतात की मानसिक त्रास होत असेल तरी मला काहीही होत नाही मी ठिक आहे असं स्वत: शी खोटं बोलू नका. त्रास स्विकारा आणि त्याच्यावर काम करा. माणसाने कधीही आहे त्या परिस्थितीतून वाट काढत पुढे जाणं भाग आहे.त्यामुळे दु:ख होणं हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो स्विकारलाच पाहिजे.

आर्य सत्ये ही बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाची शिकवण असून ती गौतम बुद्ध यांनी मानवजातीला दिली आहे. या चार सत्यांद्वारे जीवनातील दुःखाचे स्वरूप, त्याची कारणे आणि त्यावर उपाय यांचे सखोल स्पष्टीकरण मिळते.

Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ

पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख 
या सत्यात सांगितले आहे की मानवी जीवन हे पूर्णपणे सुखमय नसून त्यात विविध प्रकारची दुःखे आहेत. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, प्रिय व्यक्तींपासून दूर होणे, अप्रिय गोष्टींचा सामना करणे—हे सर्व दुःखाचे प्रकार आहेत. म्हणजेच, जीवनात दुःख अपरिहार्य आहे.

दुसरे आर्य सत्य म्हणजे दुःख समुदय

या सत्यात दुःखाचे मूळ कारण सांगितले आहे, आणि ते म्हणजे तृष्णा (इच्छा, लोभ, आसक्ती). माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या इच्छेत अडकलेला असतो. या इच्छांमुळे त्याला असंतोष आणि दुःख निर्माण होते.

तिसरे आर्य सत्य म्हणजे दुःखनिरोध 
याचा अर्थ दुःखाचा अंत होऊ शकतो. जर माणूस आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून ती पूर्णपणे नष्ट केली, तर तो दुःखातून मुक्त होऊ शकतो. ही अवस्था निर्वाण म्हणून ओळखली जाते, जी शांतता आणि समाधानाची सर्वोच्च अवस्था आहे.

चौथे आर्य सत्य म्हणजे दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा

यामध्ये दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे, ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. यात योग्य विचार, योग्य वाणी, योग्य कर्म, योग्य जीवनशैली, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती आणि योग्य ध्यान यांचा समावेश आहे.अशा प्रकारे, आर्य सत्ये माणसाला जीवन समजून घेण्याचा आणि दुःखातून मुक्त होण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं

 

Web Title: Gautam buddha why does suffering occur what are the exact reasons for it gautam buddha taught the four noble truths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Buddha Purnima
  • Marathi News
  • spiritual

संबंधित बातम्या

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन
1

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन

Defense Stocks : 3.5 लाख कोटींची ऑर्डर बुक! डिफेन्स क्षेत्रातील ‘या’ 3 शेअर्सवर तज्ज्ञांची नजर
2

Defense Stocks : 3.5 लाख कोटींची ऑर्डर बुक! डिफेन्स क्षेत्रातील ‘या’ 3 शेअर्सवर तज्ज्ञांची नजर

Gold Investment: सोनं विकण्याची हीच योग्य वेळ? जाणून घ्या गोल्ड गुंतवणुकीतून कधी बाहेर पडणं ठरेल फायदेशीर
3

Gold Investment: सोनं विकण्याची हीच योग्य वेळ? जाणून घ्या गोल्ड गुंतवणुकीतून कधी बाहेर पडणं ठरेल फायदेशीर

60000 कोटी स्वाहा… फक्त 5 दिवसांत कोटींचं नुकसान, ‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना तगडा झटका
4

60000 कोटी स्वाहा… फक्त 5 दिवसांत कोटींचं नुकसान, ‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना तगडा झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.