फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा हे राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते, मात्र श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी, म्हणजेच श्रावणषष्ठी, हा दिवस विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी जोतिबा गडावर भव्य यात्रा भरते. भर पावसातही लाखो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गडावर येतात. भक्तिभाव, पारंपरिक विधी आणि लोकसंस्कृती यांचा संगम असलेली ही यात्रा महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव मानली जाते. जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला श्रावणषष्ठी यात्रा भरते. महाराष्ट्रातील अनेक जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ आणि ग्रामदैवतांच्या मंदिरामध्ये या दिवशी विशेष उत्सव आणि यात्रा पाहायला मिळते.
पौराणिक कथेनुसार श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्याचवेळी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगांचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल आणि वाळ्याने खास पूजा केली. तेव्हापासून आजतागायत श्रावण शुक्ल षष्ठी तिथीला रात्रभर जागरण करून देवीची लिंबू, बेल आणि फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते.
या यात्रेचं वैशिष्ट्य असं की भर पावसातही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. या यात्रेत फक्त धुपारती सोहळा निघतो. ही यात्रा रात्रभर असते. मंदिरात रात्रभर देवीचा जागर केला जातो. पहाटे धुपारती सोहळा निघून अंगारा वाटप झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते. श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. षष्ठी तिथी ही शक्ती, संरक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी देवस्थानामध्ये अभिषेक, पूजा, कीर्तन भजन आणि पालखी सोहळे आयोजित केले जातात. भाविक नवस फेडण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देखील दर्शन घेतात. ही यात्रा ग्रामीण संस्कृती आणि लोकपंरपरेच दर्शन घडवते. भाविक पायी दिंडी काढून खास देवदर्शनासाठी येताता. कुटुंबाच्या कल्याणासाठी नवस आणि ओटी भरण्याची प्रथा देखील अनेक ठिकाणी आहे. काही ठिकाणी स्थानिक बाजार, खेळणी, मिठाई आणि पारंपरिक वस्तूची दुकानं या यात्रेच आकर्षण ठरतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला श्री क्षेत्र जोतिबा येथे भरणाऱ्या धार्मिक उत्सवाला श्रावणयष्ठी यात्रा असे म्हणतात. या दिवशी हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गडावर येतात.
Ans: पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला होता. त्या घटनेच्या स्मरणार्थ ही यात्रा साजरी केली जाते आणि विशेष पूजा-अर्चा केली जाते.
Ans: या दिवशी लिंबू, बेलपत्र, दुर्वा अर्पण करणे, धुपारतीत सहभागी होणे, रात्रभर जागरण करणे, जोतिबाचे दर्शन घेणे आणि भक्तिभावाने प्रार्थना करणे विशेष शुभ मानले जाते.






