प्रेमानंद महाराजांच्या बैठकीत एका भक्ताने महाराजांना प्रश्न केला की, जर पत्नी पतीचा मानसिक छळ करत असेल किंवा पती खोटं वागत असेल तर पतीने काय करावं ? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, कोणतंही नातं हे एका बाजूने कधीच नसतं. पती आणि पत्नीच्या नात्यात त्या दोघांची भूमिका फार महत्वाची असते. खरंतर कोणा एकामुळे नातं कधीच खराब होत नाही. जर पत्नी पतीशी चुकीचं वागत असेल किंवा खोटं बोलत असेल तर सरळ सरळ पत्नी चुकीची आहे असा अर्थ होत नाही. पत्नीच्या या वागण्यामागे नेमकं कारण काय किंवा ती अशी का वागते ? हे पतीने एकदा समजून घ्यायला हवं.
नातं हे दोघांचं असतं असंही असू शकतं की, पतीने पत्नीशी नातं सांभाळताना तिला प्रेम , आदर दिला नसेलं किंवा तिला कधी चुकीची वागणूक दिली असेल . हे आधी पतीने समजून घ्यायला हवं. आपल्या पत्नीशी आपण कधी चुकीचं वागलो का हे देखील लक्षात घेतलं तर पती पत्नीचं नातं सांभाळण्यात मदत होईल. प्रेमानंद महाराज पुढे असंही म्हणतात की, जेव्हा पत्नी पतीशी खोटं वागते तेव्हा पतीने मोकळेपणाने तिच्याशी संवाद साधणं महत्वाचं असतं. तिच्यावर खूप प्रेम केलं तिच्या विश्वास दिला तर कदाचित नातं तुटण्यापेक्षा ते आणखीच घट्ट होतं, असं उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिलं.






