• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Navrashtra Navdurga Asmita Gokhale Shared How They Are Elminating Plastic

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

पर्यावरणाला पोखरणारं प्लास्टिक योग्य आणि शाश्वत पद्धतीने कसं नष्ट करता येईल? याचं उत्तर अस्मिता गोखले यांनी नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष मुलाखतीत दिलं.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 30, 2025 | 04:15 AM
अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा 'पर्यावरणपूरक' उपाय

अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा 'पर्यावरणपूरक' उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग मी प्लास्टिक आहे असं समजा साहेब!” मुळशी पॅटर्न चित्रपटातील हा डायलॉग चांगलाच गाजला. आज बाजारातून कोणतीही वस्तू घरी आणण्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो. एवढंच काय, साधा टपरीवरील चहा पार्सल घेतानाही आपल्याला तो प्लास्टिकच्या पिशवीतच बांधून दिला जातो. यामुळे प्लास्टिकचा खच तर वाढतोच आहे, पण कॅन्सरसारखा मोठा धोका सुद्धा निर्माण होत आहे.

गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवल्यास त्यातील रसायनं वितळून त्या पदार्थात मिसळतात. हेच पदार्थ आपल्या पोटात जातात आणि आरोग्य बिघडवू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला देतात.

खरंतर, अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत की प्लास्टिक कधीच नष्ट होत नाही. मात्र, मुलुंडच्या अस्मिता गोखले आणि त्यांच्या अथक फाउंडेशनने ही समजूत खोटी ठरवली असून गेली नऊ वर्षे ते प्लास्टिक निर्मूलनाचं काम करत आहेत. नुकतंच अस्मिता गोखले यांनी या सकारात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष मुलाखतीत दिली.

Navrashtra Navdurga: मूर्ती लहान पण कीर्ती महान..! अवघ्या १३ वर्षीय अक्साने धनुर्विद्यात मिळवले गोल्ड मेडल

प्लास्टिक निर्मूलनाची सुरुवात कधीपासून झाली?

येत्या फेब्रुवारी 2026 ला आमच्या प्लास्टिक निर्मूलनाच्या कार्याला नऊ वर्षं पूर्ण होत आहेत. या काळात आम्ही लोकांकडून प्लास्टिक गोळा करत आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही दारोदार जाऊन प्लास्टिक गोळा करतो. आम्ही लोकांना “माझं प्लास्टिक, माझी जबाबदारी” याची सवय लावली आहे. त्यानुसार लोक स्वतःहून त्यांचं प्लास्टिक आम्हाला सुपूर्त करतात आणि त्यावर प्रक्रिया करून ते नष्ट केलं जातं.

…आणि मग प्लास्टिक निर्मूलनाचं काम घेतलं हाती

कॅन्सर हा जगातील सर्वात मोठा आजार आहे आणि त्यामागे एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्लास्टिक. मात्र, याविषयी कोणी ठोस काम करत नव्हतं. अशा वेळी आम्ही हे काम हाती घेतलं आणि ते सातत्याने नऊ वर्षांपासून सुरू आहे.

तेव्हा मात्र प्लास्टिक वाईट ठरलं

खरं तर प्लास्टिक वाईट नाही. त्याच्या उत्पादनाची सुरुवात आपल्यासाठी झाली. पूर्वी वस्तू ठेवण्यासाठी काच आणि मातीची भांडी वापरली जायची, पण ती तुटायची. यालाच पर्याय म्हणून प्लास्टिक आलं. मात्र, जेव्हा प्लास्टिकचा अतिवापर सुरू झाला तेव्हा ते वाईट ठरलं.

सगळं सरकार करणार, मग आपण काय करणार?

लोकांना प्लास्टिकच्या तोट्याबाबत माहिती आहे. पण ते म्हणतात सरकारने प्लास्टिक बंद करावं. पण आपण वापरलेल्या प्लास्टिकची जबाबदारी आपली नाही का? ती सरकारवर ढकलून कसं चालेल? म्हणूनच आम्ही लोकांना “माझं प्लास्टिक, माझी जबाबदारी” ही सवय लावली.

Navdurga: ‘कष्टाला पर्याय नाही, पण स्वतःवर प्रेम करायला शिका’, मराठमोळ्या YouTuber ऐश्वर्या पेवालचा प्रेरणादायी प्रवास

प्लास्टिक नष्ट करणे म्हणजे आव्हानच

फेब्रुवारी 2017 मध्ये आम्ही पहिला ड्राइव्ह सुरू केला. त्यावेळी लोकांना बोलावून प्लास्टिकच्या तोट्याबाबत माहिती दिली. काहींनी टाळ्या वाजवल्या, तर काहींनी म्हटलं, “हा फक्त दिखावा आहे, दोन-चार महिने करतील आणि बंद पडतील.” अशा प्रतिक्रियांमुळे लोकांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सबुरी ठेवली. नंतर लोकांचा प्रतिसाद वाढू लागला.

प्लास्टिक रिसायकल म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं

लोकं म्हणतात आम्ही प्लास्टिक रिसायकल करतो. आजकाल वापरलेल्या प्लास्टिकमधून कपडे, बॅग किंवा शोभेच्या वस्तू तयार होतात. पण या वस्तू ५–१० वर्ष टिकल्या तरी पुढे त्या खराब झाल्यावर त्याचं काय? त्या वस्तूतील प्लास्टिक वेगळं करून फेकता येतं का? म्हणूनच आमच्या मते, प्लास्टिक रिसायकल म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं.

होय! आम्ही प्लास्टिक पूर्णपणे नष्ट करतो

आमचा ड्राइव्ह दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो. या दिवशी लोक त्यांच्याकडील प्लास्टिक आम्हाला देतात. अथक फाऊंडेशनने पुण्यातील जीडीपीएल या कंपनीशी सहकार्य केलं आहे. या कंपनीतील वैज्ञानिकांनी एक विशेष मशीन तयार केलं आहे, जे प्लास्टिक पूर्णपणे नष्ट करतं.

Web Title: Navrashtra navdurga asmita gokhale shared how they are elminating plastic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर
1

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग
2

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?
3

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Navratri 2025 : कुठे आई माऊली तर कुठे आई राजा देवीच्या जषघोषाचा नेमका अर्थ काय ?
4

Navratri 2025 : कुठे आई माऊली तर कुठे आई राजा देवीच्या जषघोषाचा नेमका अर्थ काय ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.