• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Shaheed Diwas 2025 Honoring Martyrs On Mahatma Gandhis Death Anniversary Nrhp

Shaheed Diwas 2025: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात पाळला जातो शहीद दिन

30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसेने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून पाळला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 30, 2025 | 02:30 PM
Shaheed Diwas 2025 Honoring martyrs on Mahatma Gandhi's death anniversary

Shaheed Diwas 2025: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात साजरा केला जातो शहीद दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ पाळला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी संपूर्ण देशभरात श्रद्धांजली अर्पण केली जाते.

या दिवशी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मान्यवर राजघाट येथील गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतात. यानंतर संपूर्ण देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळले जाते आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला जातो.

30 जानेवारीचा ऐतिहासिक संदर्भ

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, 30 जानेवारी 1948 रोजी, महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या झाली. नथुराम गोडसे या कट्टर विचारसरणीच्या व्यक्तीने बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेदरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गांधीजींच्या या दुर्दैवी निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. याच कारणास्तव 30 जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शांततामय मार्गाने सत्याग्रह चळवळीचे नेतृत्व केले. असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळातच ते असहिष्णुतेच्या बळी ठरले.

शहीद दिवसाचे महत्त्व

शहीद दिवस केवळ गांधीजींना नव्हे, तर स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येक हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतभर शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात येतो. विविध ठिकाणी चर्चासत्रे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शहीद दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका खरंच भारताला फक्त शस्त्रे विकू इच्छितो, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदयात दडलाय ‘चोर’?

30 जानेवारी आणि 23 मार्च – दोन शहीद दिवस का?

भारतात दरवर्षी दोन वेळा शहीद दिवस पाळला जातो. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर 23 मार्चला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मरणार्थही या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा दिली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या क्रांतिकारकांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी जेम्स साँडर्स याची हत्या केली होती. यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना देशद्रोही ठरवत फाशी देण्याचा निर्णय घेतला. या तीन क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे हा दिवसही ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन बनवतोय जगातील सर्वात धोकादायक अणुबॉम्ब; ड्रॅगनच्या ‘या’ सिक्रेट फॅसिलिटीमुळे जगाला धोका

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

शहीद दिवस हा केवळ श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस नसून, त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्त्वांवर भर देत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आजच्या पिढीनेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या एकतेसाठी योगदान द्यावे, अशी भावना या दिवसाच्या निमित्ताने जागृत होते. 30 जानेवारी आणि 23 मार्च या दोनही दिवसांचे देशाच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या काळातही, गांधीजींच्या विचारांनुसार अहिंसा आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जात आपण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

Web Title: Shaheed diwas 2025 honoring martyrs on mahatma gandhis death anniversary nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • India History
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
1

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

50 Rupees Coin: ५० रुपयांचे नाणं चलनात येणार का? अर्थ मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिलं उत्तर
2

50 Rupees Coin: ५० रुपयांचे नाणं चलनात येणार का? अर्थ मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिलं उत्तर

“सुरज शुक्लाला अटक करा” – मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक रस्त्यावर
3

“सुरज शुक्लाला अटक करा” – मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक रस्त्यावर

Mahatma Gandhi statue : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; विटंबनात्मक घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक
4

Mahatma Gandhi statue : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; विटंबनात्मक घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी भोरमध्ये अनोखं आंदोलन; आंदोलकांनी साष्टांग प्रणाम करत केलं…

वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी भोरमध्ये अनोखं आंदोलन; आंदोलकांनी साष्टांग प्रणाम करत केलं…

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

कृष्णाच्या आवडत्या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात

कृष्णाच्या आवडत्या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.