हरमनप्रीत कौरचे कर्णधारपद धोक्यात (फोटो- ians)
भारताचा संघ वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे वर्ल्डकप मध्ये बाहेर पडल्याने हरमनप्रीत कौरचे कर्णधारपदकाढून घेतले जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले अमोल मुजुमदार?
अमोल मुजुमदार यांनी हरमनप्रीत कौरला पाठिंबा दिल्याचे समोर येत आहे. हरमनप्रीत कौरने क्रिकेटच्या सर्व फॉर्मटमध्ये भारताचे नेतृत्व करावे असे मला वाटते. मात्र कोणाला कर्णधार ठेवायचे आणि कोणाला नाही याचा नोइरणे सिलेक्टर्स करतात असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटचा निर्णय हा सिलेक्टर्सचा असतो. मात्र मला विचाराल तर हरमनप्रीत कौरने नेतृत्व करावे असे मला वाटते.
टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही. हरमनप्रीत कौरने 5 सामन्यांमध्ये 141 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचे एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले. कालच्या सामन्यात तिने 56 रन्सची खेळी केली आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२६ स्पर्धा आता रोमांचक आणि निर्णायक टप्य्यावर पोहचली आहे. ग्रुप स्टेजमधील सामने संपल्यानंतर सेमिफायनचे चित्र स्पष्ट झाले आहेत. ऑस्ट्रेलियामे टीम इंडियाचा दारुण पराभव केल्यानंतर भारत विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चार संघ निश्चित सेमिफायनलासाठी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ‘अ’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने ‘ब’ गटातून अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गतविजेता न्यूझीलंड, तसेच भारत, श्रीलंका, पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे सर्व संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.






