
बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे शेड्यूल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत होणार कसोटी सामना
घरगुती हंगामाचे वेळापत्रक जाहीर
BCCI News: भारतीय क्रिकेट संघ 2026 -2027 या वर्षातील दौरे जाहीर झाले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 4 दिग्गज संघ भारतात खेळण्यासाठी (Cricket News) येणार आहेत. या शेड्यूलनुसार भारतीय संघ एकूण 22 सामने खेळणर आहे. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिबॉम्बे हे चार संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 27 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. गुवाहाटी, इंदौैर, रांची, लखनौ आणि अन्य ठिकाणी हे सामने होणार आहेत.
तसेच श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. एकदिवसीय सामने दिल्ली, बंगलोर आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. तर पुणे, कटक आणि राजकोटमध्ये टी-20 सामने होणार आहेत. तर झिबॉम्बे संघ तीन एक दिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे.
ODI विश्वचषक 2027 साठी दोन जागांसाठी लढत! विश्वचषक विजेते संघ पडले मागे, वाचा संपूर्ण समीकरण
यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील 5 कसोटी सामने होणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे या सामन्यांना संबोधले जाते. या वर्षात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारत 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत सामने खेळणार आहे. तर श्रीलंकेविरुद्ध भारत 13 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान खेळणार आहे. 21 जानेवारी ते 3 मार्च पर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होणार आहे.
ODI विश्वचषक 2027 साठी दोन जागांसाठी लढत
आयपीएल झाल्यानंतर भारताचा संघ आणि बीसीसीआयचे लक्ष आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष असणार आहे. मागील काही वर्षामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषकामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर भारताच्या संघाची नजर आता 2027 च्या विश्वचषकावर असणार आहे. आयपीएल २०२६ दरम्यानही, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी २० स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून असेल. या खेळाडूंपैकी १५ जणांना पुढील वर्षभरात विस्तारित संधी दिली जाईल.
RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!
त्यामुळे, विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांना आयपीएल २०२६ मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या, संघातील दोन जागांसाठी तीन खेळाडू स्पर्धा करत आहेत. या खेळाडूंमध्ये, विश्वचषक विजेता संघ शर्यतीत सर्वात मागे असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघात दोन वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू खेळवायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सध्या दोन जागांसाठी तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरू आहे.