
Virat Kohli: '... कारण हे माझे घर आहे'; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी
विराट कोहलीने केल्या नाबाद 75 रन्स
आरसीबीने गुजरातला केले पराभूत
Tata IPL 2026 RCB Vs GT Final Updates: आयपीएल 22026 चा थरार संपला आहे. यंदाचा हंगाम रोमांचक आणि अनेक रेकॉर्डने खास असा होता. दरम्यान यंदाचा हंगाम आरसीबीने आपल्या नावावर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर विराट कोहलीने एक भावुक असा संदेश पोस्ट केला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
विराट कोहलीने शानदार खेळी करत आरसीबीला फायनलमध्ये जिंकवून दिले. त्याने 75 रन्सची नाबाद खेळी केली होती. आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदावर विराट कोहलीने एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याच्या आणि संघाचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे. ‘हंगामाची सुरुवात विश्वासाने केली. हा विश्वास सलग दोन ट्रॉफी जिंकून पूर्ण केला. या संघाने प्रत्येक क्षण एकत्र साजरा केला आहे. हे खास आहे कारण हे माझे घर आहे. ‘
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली भावूक
विराट कोहील १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. आपल्या पहिल्या IPL ट्रॉफीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणारा आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली, सलग दुसऱ्या विजयानंतर भावूक झाला. हा विजय त्याच्यासाठी किती महत्त्वाचा अन् खास आहे, हे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केले.
विराट कोहलीने संघातील काही खेळाडू आणि ट्रॉफीसोबतचे चार वेगवेगळे फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की “गेल्या वर्षी आम्ही स्वतःला प्रश्न विचारला होता की, आपण सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकू शकतो का? आणि आज आम्ही इथे आहोत.” कोहलीची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत RCB आणि कोहलीचे अभिनंदन केले.
RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली. त्याने शेवटचा विजयी षटकार ठोकत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा क्षण पाहून स्टेडियममधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. सामना संपताच विराटने मैदानात सेलिब्रेशन केले. गेल्या वर्षी संघाच्या विजयात कोहलीच्या दमदार कामगिरीचा मोलाचा वाटा होता. या हंगामातही तो संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १६ सामन्यांमध्ये ६७५ धावा केल्या. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हा कोहलीचा सलग चौथा हंगाम होता, ज्यात त्याने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या.