RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज
विराट कोहील १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. आपल्या पहिल्या IPL ट्रॉफीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणारा आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली, सलग दुसऱ्या विजयानंतर भावूक झाला. हा विजय त्याच्यासाठी किती महत्त्वाचा अन् खास आहे, हे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केले.
विराट कोहलीने संघातील काही खेळाडू आणि ट्रॉफीसोबतचे चार वेगवेगळे फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की “गेल्या वर्षी आम्ही स्वतःला प्रश्न विचारला होता की, आपण सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकू शकतो का? आणि आज आम्ही इथे आहोत.” कोहलीची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत RCB आणि कोहलीचे अभिनंदन केले.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली. त्याने शेवटचा विजयी षटकार ठोकत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा क्षण पाहून स्टेडियममधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. सामना संपताच विराटने मैदानात सेलिब्रेशन केले. गेल्या वर्षी संघाच्या विजयात कोहलीच्या दमदार कामगिरीचा मोलाचा वाटा होता. या हंगामातही तो संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १६ सामन्यांमध्ये ६७५ धावा केल्या. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हा कोहलीचा सलग चौथा हंगाम होता, ज्यात त्याने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या.
२०२५ मध्ये १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत RCB ने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2026 मध्ये पुन्हा ट्रॉफी जिंकत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) याच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केली.






