बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? (Photo Credit- X)
BCCI President Salary: आशिया कप २०२५ यांच्यातील अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात दुबईतील मैदानात खेळवला जाणार आहे. त्याआधीच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवीन अध्यक्ष मिळाला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मनहास (Mithun Manhas) यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, हे प्रतिष्ठित पद भूषवणारे मनहास जम्मू आणि काश्मीरमधील पहिले व्यक्ती बनले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये जन्मलेले मिथुन मनहास यांनी त्यांच्या कारकिर्दीचा मोठा भाग दिल्ली क्रिकेट संघासाठी खेळण्यात घालवला. एक विश्वासार्ह मध्यमगती फलंदाज, मनहास यांनी रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले. त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९,७०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांचा भाग होते. पहिल्यांदाच एखादा अनकॅप्ड खेळाडू मंडळाचा अध्यक्ष बनला आहे. त्यांनी भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच या पदावर असलेल्या व्यक्तीचा पगार, त्यांना मिळणारे भत्ते आणि त्यांच्याकडे असलेले अधिकार यांचा आढावा घेऊ.
The 94th Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India BCCI has just concluded in Mumbai. Take a look at all the key decisions made 🔽https://t.co/sHt2sCbcaI — BCCI (@BCCI) September 28, 2025
बीसीसीआय अध्यक्षांना कोणताही निश्चित पगार मिळत नाही. हे पद ‘पदाधिकारी’ किंवा मानद पद म्हणून वर्गीकृत असल्यामुळे, त्यावर असलेल्या व्यक्तीला विविध भत्ते आणि सुविधा दिल्या जातात.
याशिवाय, देशांतर्गत आणि परदेशी दौऱ्यांसाठी बिझनेस किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था बोर्डकडून केली जाते. बोर्ड सर्व प्रवास आणि इतर अधिकृत खर्च उचलतो.
बीसीसीआय अध्यक्षांकडे कोणते अधिकार आहेत?
बीसीसीआय अध्यक्ष हे केवळ एक पद नाही; भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांची थेट भूमिका असते. संघ निवडीशी संबंधित बाबी असोत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) वाटाघाटी असोत किंवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन अंतिम करणे असो, बीसीसीआय अध्यक्षांकडे हे सर्व अधिकार असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, भारतीय क्रिकेटची दिशा ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांकडे आहे.
BCCI कडून निवड समितीत मोठे बदल! प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा पुरुष निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला, तर तामिळनाडूचे माजी फलंदाज एस. शरथ ज्युनियर निवड समितीमध्ये पुन्हा परतले आहेत. अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
एजीएममध्ये, अमिता शर्मा यांनी आता नीतू डेव्हिड यांची जागा घेतली आहे. ११६ एकदिवसीय सामने खेळलेल्या माजी भारतीय वेगवान गोलंदाजासोबत श्यामा डे, जया शर्मा आणि श्रावंती नायडू हे सदस्य असणार आहेत. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर सुरू होणार आहे.
एस. शरथ आणि सुब्रतो बॅनर्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग हे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरुष निवड समितीत दाखल झाले आहेत. शिवसुंदर दास आणि अजय रात्रा हे देखील समितीचे इतर सदस्य आहेत. प्रज्ञान ओझाने २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामन्यांमध्ये भारतासाठी प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने एकूण १४४ विकेट्स घेतल्या आहेत.