फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना पार पडला. भारताच्या संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाने आता मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये कॅप्टनने पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.
चौथ्या कसोटीतील पराभवानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “आज मी जिथे उभा होतो तिथे उभा आहे, एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही निकाल आमच्या वाट्याला आले नाहीत, हे निराशाजनक आहे. “मानसिकदृष्ट्या हे चिंताग्रस्त झाले आहे परंतु आत्तापर्यंत, काही गोष्टी आहेत ज्या मला एक संघ म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे.”
IND vs AUS : टीम इंडियाने सामना गमावला! ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी केलं पराभूत, वाचा संपूर्ण अहवाल
२०२४ ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यापासून जसप्रीत बुमराह ने कमालीची कामगिरी केली आहे त्याव्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने विशेष कामगिरी केली नाही. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा एकटाच सामना करत असल्याचे दिसते. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, बुमराह अतिशय हुशार आहे, आम्ही त्याला अनेक वर्षांपासून पाहत आहोत, त्याला फक्त देशासाठी खेळायचे आहे आणि संघासाठी चांगले काम करायचे आहे, परंतु दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने फारसा पाठिंबा मिळाला नाही. ”
Rohit Sharma said “I stand where I am standing today – Few results didn’t go our way as a captain and batter it is disappointing – mentally its disturbing but as of now that is where it is, there are things we as a team and I need to look at”. [Press] pic.twitter.com/zOGwadMn9z
— Johns. (@CricCrazyJohns) December 30, 2024
सिडनी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सिडनीमध्ये आम्हाला संघ म्हणून जे काही करता येईल ते करण्याची संधी आहे. आम्ही तो सामना चांगला खेळण्याचा प्रयत्न करू.” आता टीम इंडियासाठी सिडनी कसोटी जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे. टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर पुढचा सामना जिंकावा लागणार आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेचा शेवटचा पाचवा सामना ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत जर टीम इंडियाला बरोबरी करायची असल्यास भारताचा संघाला शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुद्धा भारताचयास संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.