IND vs SL: मानव सुथारची जादू, भारताने मिळवला श्रीलंकेवर विजय (फोटो सौजन्य - Instagram)
Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड
गॉल कसोटीत भारतीय संघ आणि श्रीलंका एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्याचा निकाल शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात लागला. भारतीय संघाने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने ३७२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ अवघ्या २०६ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात भारताकडून मानव सुथारने ६ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने २ बळी घेतले. श्रीलंकेकडून सोनल दिनुशाने दुसऱ्या डावात ८४ धावांची खेळी केली. गॉल कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने ६ गडी गमावले.
तत्पूर्वी, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने श्रीलंकेच्या चार विकेट्स घेतल्या होत्या. ३७२ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. मानव सुथारने शेवटच्या दिवशी शानदार गोलंदाजी करत सहा विकेट्स घेतल्या.
गॉल कसोटीतील विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला मोठी बढती मिळाली आहे. १० सामन्यांमधून पाच विजय, चार पराभव आणि एक बरोबरीसह ६४ गुण आणि ५३.३३ टक्केवारीसह भारत आता सध्याच्या WTC चक्रात पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर भारताच्या पुढे आहेत. या पराभवामुळे, पाच सामन्यांमधून एक विजय, दोन पराभव आणि दोन बरोबरीसह श्रीलंका भारताच्या खाली सहाव्या स्थानावर घसरला आहे.
भारताने आपल्या पहिल्या डावात ४६२ धावा केल्या आणि श्रीलंकेला २८४ धावांवर बाद करून १७८ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. भारताने आपल्या दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले. गॉलमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यापूर्वी कधीही झाला नसल्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात होता.
IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर






