विराट कोहली विरूद्ध वैभव सूर्यवंशी कोणाचा पगडा भारी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने खेळत आहे त्यामुळे तो सर्वांचा रेकॉर्ड मोडेल याच आशेने त्याच्याकडे पाहिले जात आहे आणि विराट कोहलीचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. पण वैभव सूर्यवंशीने फारच कमी वेळात आपला असा मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. वैभवने सर्वच बॉलर्सना सळो की पळो करून सोडलं आहे. पण विराट ज्या पद्धतीने धावा काढतो त्यानुसार आज वैभव धावा काढेल का? याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.
बंगळूरू विरुद्ध राजस्थान
राजस्थान रॉयल्स या हंगामातील सर्वात आक्रमक फलंदाजी युनिट म्हणून उदयास आले आहे. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी विरोधी गोलंदाजांवर दबाव टाकत संघाला वेगवान सुरुवात करून दिली आहे. संघाने आपल्या गोलंदाजीने आपल्या योजनांची अचूक अंमलबजावणीही केली आहे. दुसरीकडे, बंगळूरूने आपल्या संतुलित संघ संयोजनाने प्रभावित केले आहे. विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. सामन्यात पावसाची १४ टक्के शक्यता आहे.
सर्वोत्तम सलामीच्या जोड्या
या सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीच्या जोड्याही बारकाईने तपासल्या जातील. राजस्थानकडून सलामीवीर म्हणून खेळणारे यशस्वी आणि वैभव १२.३६ च्या रनरेटने धावा करतात. गेल्या हंगामापासून २०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सलामीच्या जोड्यांमध्ये हा रनरेट सर्वोत्तम आहे. या जोडीची प्रति डाव सरासरी ६४.७ धावा आहे, जी सर्वोत्तम आहे. विराट आणि सॉल्टचा रनरेट १०.२४ असून तो तिसरा सर्वोत्तम आहे. विराट आणि सॉल्टने १५ डावांमध्ये ६११ धावा जोडल्या आहेत, तर यशस्वी आणि वैभवने १० डावांमध्ये ६४७ धावा जोडल्या आहेत.
IPL मध्ये पुन्हा Fixing चे भूत? गुजरातविरुद्ध दिल्ली मुद्दाम हरली? आरोपांमागचं नेमकं सत्य काय?
RCB सीएसकेची बरोबरी करेल का?
बंगळूरुने आयपीएलमध्ये ३६ वेळा २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जर त्यांनी पुन्हा २०० पेक्षा जास्त धावा केल्या, तर ते हा टप्पा सर्वाधिक वेळा गाठण्याच्या बाबतीत चेन्नईची (३७) बरोबरी करतील. याकडे सर्वांचे आता आज लक्ष लागून राहिले आहे.






