
जसप्रीत बुमराह अन् वैभव सूर्यवंशी येणार आमनेसामने
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच
Tata IPL MI vs RR Live: आज गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे. आपले दोन्ही सामने राजस्थानच्या संघाने जिंकले आहेत. तर मुंबईने पहिला जिंकला असून दुसरा सामना गमावला आहे. दरम्यान आज मैदानात वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात टक्कर पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.
15 वर्षीय वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही सामन्यांमध्ये वैभवने चांगली खेळी केली आहे. तर मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह नावाचे वादळ आहे. क्रिकेट विश्वातील प्रमुख गोलंदाजांच्या यादीत बुमराहचा समावेश होतो. आज वाईबाहव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराहमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जोरदार खेळी करून आपले स्थान निर्माण केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 15 चेंडूत 50 धावा तर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड आहे.
MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट
दुसरीकडे जसप्रीत बुमराह हा घातक गोलंदाज आहे. फलंदाजांना जेरीस आणण्याची कला बुमराहकडे आहे. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचे ते प्रमुख अस्त्र आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना अत्यंत रंगतदार होणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?
संपूर्ण आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये 16 मुंबई इंडियन्स आणि 14 राजस्थान रॉयल्सच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचे पारडे जड वाटत आहे. मात्र यंदा राजस्थान रॉयल्सने ग्राऊंडवर कमाल केली आहे. दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे.
MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?
मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट
बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.