भारतीय क्रिकेट संघ (फोटो - ians)
आयसीसी रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचे मोठे नुकसान
आतापर्यंत 4 पैकी 3 टी 20 सामन्यांत झाला भारताचा पराभव
उद्या होणार भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20 सामना
Indian Cricket Team ICC Rankings: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. दरम्यान पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याआधी भारत अन् आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची सिरिज झाली. त्यात देखील भारताचा पराभव झाला. त्यामुळे आयसीसी रॅंकिंगमध्ये भारताला मोठे नुकसान झाले आहे.
श्रेयस अय्यरला भारताचे टी 20 कर्णधारपद सोपवले गेल्यावर भारताला अद्याप एकही विजय प्राप्त करता आळले नाही. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस आयेर करत होता. आयपीएलमध्ये त्याने अत्यंत शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता सध्या सलग तीन सामने पराभूत झाल्याने आयसीसी रॅकिंगमध्ये भारत अन् इंग्लंडमधला फरक कमी झाला आहे.
त्यामुळे श्रेयस अय्यरचे कर्णधारपद धोक्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा मालिका पराभव झाल्यास श्रेयस अय्यरचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केवळ चर्चांना उधाण आले आहे.
टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.
आतापर्यंत भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 पैकी 2 टी 20 सामने पार पडले आहेत. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामना भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे उद्या होणारा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. उद्याचा सामना पराभूत झाल्यास भारताचे रेटिंग कमी होऊ शकते. तसेच सिरिज गमावण्याची शक्यता देखील वाढणार आहे.






