
भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चार सामने खेळले आहेत , पण अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. श्रेयसच्या नेतृत्वाखाली संघ आयर्लंडकडून सलग दोन सामने हरला आणि पहिल्यांदाच भारताला या संघाकडून व्हाईटवॉश मिळाला. यानंतर, इंग्लंड विरुद्ध पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला ४ विकेट्सने पराभवा पत्कारावा लागला. टीम इंडिया सध्या या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे आहे. आता टीम इंडियावर आणखी एक मालिका गमावण्याचे संकट आहे. जर एक जरी सामना गमावला, तर मालिका जिंकता येणार नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, ७ जुलै रोजी खेळला जाईल. हा सामना ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना रात्री १०:०० वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिला सामनाही रात्री १०:०० वाजता सुरू झाला होता, त्यानंतर दुसरा सामना सायंकाळी ७:०० वाजता झाला. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण पराभव झाल्यास मालिका जिंकण्याची कोणतीही संधी संपुष्टात येईल.
भारतीय संघाला अजूनही आपला सर्वोत्तम टीम बॅलेन्सच्या शोधात आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात बदललेला संघ मैदानात उतरतो. मागच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले, पण तोही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे, भारतीय संघ पुढच्या सामन्यात कसा संघ मैदानात उतरवतो आणि त्यावेळी संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.