अहमदाबाद विमान क्रॅशवर विराट कोहलीची प्रतिक्रिया(फोटो-सोशल मीडिया)
Ahmedabad plane crash : गुरुवार १२ जून हा भारतासाठी अतिशय वेदनादायी दिवस ठरला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी दुपारी एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादहून लंडनला २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आणि यामध्ये २४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने जगाला हादरा बसला आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असता टेक ऑफ नंतर काही वेळातच ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अशातच भारतीय क्रिकेट विश्वातून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विमान दुर्घटनेवर प्रतिक्रियासमोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर विराटने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. मी या अपघातातील बळींसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी संवेदना आहे.” अशी भावना विराटने व्यक्त केली. विराट कोहली व्यतिरिक्त हरभजन सिंग, रोहित शर्मा, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंकडून या घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : SA vs AUS : WTC Final सामन्यात Pat Cummins चे वादळ घोंघावले! लॉर्ड्सवर ५० वर्षांनी केला भीम पराक्रम..
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह १३३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेवर आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”
गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक आणि त्याचा भला मोठा स्फोट झाला. हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (फ्लाइट एआय१७१) होते, जे अहमदाबादहून लंडनसाठी निघाले होते. परंतु, उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये मेघनीनगर परिसरात दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. आतापर्यंत १३३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळेत आहे.