
Australia vs India Hockey world cup
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पूल ई चा अंतिम सामना अॅमस्टेलवीन येथील वॅग्नर स्टेडियमवर पार पडला. ऑस्ट्रेलियाने सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. पहिल्या हाफच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी मिळाली, पण भारतीय संघाने रेफरल घेतला आणि टीव्ही पंचांनी तो शॉट धोकादायक ठरवून गोल अवैध ठरवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दबाव कायम ठेवला. १०व्या मिनिटाला, अनुभवी गोलरक्षक सविताने एमी लॉटनचा रिव्हर्स शॉट अप्रतिमरित्या अडवला.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना गोल करता आला नाही. काही क्षणांनंतर ग्रेस यंगने मारलेला रिव्हर्स शॉट, उजवीकडे झेप घेऊन बिचू देवीने वाचवला. मध्यंतराच्या अगदी आधी भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या हाफमध्येही परिस्थिती तशीच राहिली. भारताला गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण त्यांचा अंतिम पास आणि फिनिशिंगमध्ये कमतरता दिसली. ४६ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो भारतीय डिफेन्सने रोखला. त्यानंतर भारताने प्रतिहल्ला चढवला, पण नवनीत आणि लालरेम्सियामी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे एक संधी हुकली.
वेळ संपत असताना, मुख्य प्रशिक्षक स्योर्ड मारिन यांनी शेवटच्या पाच मिनिटांसाठी गोलरक्षक बिचू देवीच्या जागी एका अतिरिक्त मैदानी खेळाडूला मैदानात उतरवले. ५९ व्या मिनिटाला, ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सलीमा टेटेने उत्कृष्ट गोल केला, पण तोपर्यंत भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. अखेरीस सामना ०-० बरोबरीत संपला. पूल ई मधून नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाने सेमिफायनलमध्ये फेरीत आपले स्थान निश्चित केले.
The Indian Women’s Team put up a determined fight against Australia, battling hard till the final whistle as the virtual quarterfinal ended in a 0–0 draw at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026, with Australia claiming the second semifinal spot from Pool E to join… pic.twitter.com/dQMWoTyOS2 — Hockey India (@TheHockeyIndia) August 23, 2026
या बरोबरीमुळे भारताच्या अंतिम चारमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात अपराजित राहून केली होती. त्यांनी चीन आणि इंग्लंडविरुद्ध सामने बरोबरीत सोडवले, तर दक्षिण आफ्रिकेला ६-१ ने हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. परंतु, दुसऱ्या फेरीत गतविजेत्या नेदरलँड्सकडून ०-२ ने पराभव झाल्यानंतर भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे अत्यावश्यक झाले होते, परंतु संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही.
भारतीय महिला संघ २०२६ च्या महिला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, त्यांना अजून एक सामना खेळायचा आहे. २७ ऑगस्ट रोजी, भारतीय संघ ‘पूल एफ’मधील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल. हा सामना स्पर्धेतील पाचव्या स्थानासाठी असेल.