Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
जिओच्या वाढीचा परिणाम उर्वरित बाजारपेठेच्या तुलनेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो. जिओच्या लाँचपूर्वी, ऑगस्ट 2016 मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून सुमारे 11.52 कोटी वायरलेस ग्राहक होते. हे सर्व ग्राहक तत्कालीन विद्यमान ऑपरेटर्सकडे होते. जून 2026 पर्यंत एकूण बाजारपेठ वाढून सुमारे 14.47 कोटी ग्राहकांवर पोहोचली आहे. एकट्या जिओकडे 5.79 कोटी कनेक्शन्स आहेत. इतर ऑपरेटर्सचा ग्राहकवर्ग सध्या सुमारे 8.67 कोटी आहे.
मुंबई- महाराष्ट्रात जिओचे नेटवर्क, मजबूत 4G कव्हरेज,परवडणाऱ्या दरामुळे इतर ऑपरेटर्सच्या ग्राहकांनी जिओकडे स्थलांतर केले असून ते टिकवून ठेवण्यात जिओला यश आले आहे. जिओच्या प्रवेशानंतर,स्पर्धा तीव्र झाली. काही कंपन्यांचे विलीनीकरण तर अनेक ऑपरेटर्सनी बाजारातून माघार घेतली. एअरटेलने या कालावधीत आपला ग्राहकवर्ग वाढवला.
अवघ्या चार वर्षांत मुंबई- महाराष्ट्रात जिओने पहिले स्थान मिळवले.एप्रिल 2018 मध्ये जिओने एअरटेलला तर जुलै 2020 मध्ये जिओने व्होडाफोन आयडियाला मागे टाकत सरशी केली.
जून 2026 पर्यंत जिओचा देशभरातील ग्राहकवर्ग 53.33 कोटींवर पोहोचला आहे. त्यापैकी 28.5 कोटी ग्राहक 5 जी सेवेचा वापर करत आहेत. प्रति ग्राहक 43.7 जीबी पर्यंत वापर वाढला आहे.
2016 मध्ये शून्य ग्राहकसंख्येपासून सुरुवात करून आजमितीस 5.79 कोटी ग्राहक आणि सुमारे 40 टक्के बाजारहिस्सा जिओने मिळविला आहे. बाजारपेठेत अग्रेसर होत ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करत, ग्राहक टिकवण्यात यश मिळवले आहे.



