
Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रात देखील काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण घोषणा केल्या आहेत. या घोषणानंतर स्मार्टफोन आणि टॅबलेट स्वस्त होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उत्पादनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणानंतर भारतात तयार केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किंमती कमी होऊ शकतात. याव्यतिरिक्त भारतीय कारखान्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅबलेटचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे आणि देशांतर्गत डिव्हाईस तयार केल्याने उत्पादन अधिक मजबूत होणार आहे. परिणामी ग्राहकांना परवडणाऱ्या आणि कमी किंमतीत डिव्हाईस उपलब्ध होणार आहे.
Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण
भारतात उत्पादन वाढल्याने ग्राहकांना याचा फायदा होईल आणि या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत महागडे गॅजेट उपलब्ध होतील. तसेच इलेक्ट्रॉनिक्स हब बनण्याचे देशाचे ध्येय साध्य करण्यासही मदत होईल. अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवरील शुल्कात देखील सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम बॅटरीच्या किमतीवर होणार असून लवकरच बॅटरीच्या किमती कमी होतील आणि परिणामी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किमतीत देखील घट होण्याची शक्यता आहे. एकूणच या अर्थसंकल्पानंतर स्मार्टफोन आणि टॅब्लेट्ससारख्या गॅझेट्सच्या किंमती कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.