“८८ तालुक्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन पालखेड येथील कार्यकारी अभियंता भागवत यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता पाणी २५ फेब्रुवारीलाच सुटणार आहे. शेतकऱ्याऱ्यांनी याबाबत कुठलेही चिंता करू नये”, असं विधान आमदार किशोर दराडे यांनी केलं आहे.
“८८ तालुक्यातील बऱ्याच शेतक-यांनी आमच्या शिवसेना कार्यालयाशी संपर्क केला. शेतकऱ्यांनी आम्हाला वेळीच सावध केल्याने आमदारांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत तत्काळ पाणी सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने सांगितल्याप्रमाणे पाणी २५ तारखेलाच येणार यात काहीही शंका नाही”, असं विधान येवल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी केले आहे.
“मागील आवर्तनामध्ये आम्ही वितरिकांना पाणी घेतले नाही, कारण अवकाळी पावसाने आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे वितरिकांना पाणी घेता न आल्यामुळे आज विहिरीने पूर्णपणे तळ गाठला आहे. आत्ताच्या पिकांना तत्काळ पाण्याची गरज असल्यामुळे लवकर पाणी मिळावे.”, अशी अपेक्षा धुळगावचे शेतकरी दिलीप सोनावणे यांनी व्यक्त केली. घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांच्याशी संपर्क करून पाणी १ मार्चला नव्हे तर फेब्रुवारीलाच आपण सोडावे, याबाबतची विनंती केली. २५ तालुकाप्रमुख शेळके पाटील यांनी ही सर्व बाब शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या लक्षात आणून दिली.
त्यानंतर त्यांनी तत्काळ पालखेड डावा कालव्याला पत्रव्यवहार केला आणि संबंधित अधिकारी भागवत यांना २५ फेब्रुवारीला पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. त्यावर भागवत यांनी, आम्ही १ मार्चला नव्हे तर फेब्रुवारीलाच पाणी सोडू, असे आश्वासन आमदार दराडे व शेळके पाटील यांच्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता कांदा, टरबूज, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना पाण्याचा फटका बसणार होता, परंतु त्यांना आता लवकरच पाणी मिळणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.






