
Om Birla Meets Bangladesh New Pm Tarique Rahman
यासाठी भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) काल मंगळवारी (१७ फेब्रुवारी) ढाका येथील संसदीय भवनाच्या साउथ प्लाझा मध्ये शपथविधी सोहळ्याचे बिर्ला साक्षीदार बनले. रहमान यांच्या शपथग्रहण केल्यानंतर बिर्ला यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रहमान यांना पंतप्रधान बनल्याच्या सुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांनी भारताच्या वतीने रहमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाठवलेला वैयक्तिक संदेश दिला. या पत्रात भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीच्या भावनेचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच ओम बिर्ला यांनी रहमान यांना भारताच्या अधिकृत भेटीचे आमंत्रण दिले. त्यांनी भारत आणि बांगलादेशातील द्विपक्षीय संबंध पुन्हा नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
बांगलादेशला पाठिंबा
ओम बिर्ला यांनी रहमान यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत, बांगलादेशला भारताकडून पाठिंबा दर्शवला. त्यांनी म्हटले की, बांगलादेशला एक लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेश राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात भारताचा पाठिंबा राहिल.
इतर मुद्द्यांवरील चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि बांगलादेशच्या भविष्यात सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशांनी व्यापार, सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि प्रादेशिक स्थिरतेसारख्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर लक्ष्य केंद्रित केले.
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये माजी शेख हसीना (Sheikh Hasina) सरकार पडल्यानंतर मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले होते. या काळात युनूस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे आणि हसीना यांच्या भारतात आश्रयामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. परंतु सध्याच्या नव्या सरकराने भारतासोबतच्या संबंधाला बळकटी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Just concluded a constructive meeting with Prime Minister of Bangladesh @trahmanbnp I handed over a personal letter from Prime Minister @narendramodi conveying his wishes to PM Rahman and inviting him to visit India at the earliest convenience. I extended warm congratulations… pic.twitter.com/gFNqLmnxsT — Om Birla (@ombirlakota) February 17, 2026
Ans: ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक अभिनंदन पत्र दिले. तसेच भारताच्या वतीने तारिक रहमान यांना अधिकृत भेटीचेही आमंत्रण दिले. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आशाही व्यक्त केली.
Ans: पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांचे पत्रातून बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. तसेच भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीच्या भावनेचा पुनरुच्चार करण्यात आला होता.
Ans: ओम बिर्ला यांनी रहमान यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. व्यापार, सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि प्रादेशिक स्थिरता या मुद्यांवर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.