फोटो सौजन्य: एक्स अकाऊंट @DrSJaishankar
नवी दिल्ली: यागी चक्रीवादळाने व्हिएतनाम, लाओस, आणि म्यानमारचे प्रचंड नुकसान केले आहे. अशातच भारताने या देशांना मदतीचा हात पुढे करत ऑपरेशन सद्भाव लॉन्च केले आहे. भारताने रविवारी 15 सप्टेंबरला व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन सद्भाव’ सुरू केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, ऑपरेशन ‘सद्भाव’ हे “कायद्याच्या अनुषंगाने दक्षिणपूर्व आशियाई प्रदेशात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या राष्ट्राच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, “टायफून यागीमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत आमची एकजूट दाखवून, भारत म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओसला मदत पाठवत आहे,” भारताने या देशांना हजारो डॉर्लसची मदत पाठवली आहे. व्हिएतनामला, भारताने जलशुद्धीकरण वस्तू, कंटेनर, ब्लँकेट, स्वयंपाकघरातील भांडी आणि सौर कंदील पाठवले आहेत. भारताकडून एकूण 35 टन मदत एअरलिफ्ट करण्यात आली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही मदत 83 दशलक्ष इतकी आहे.
परराष्ट्र मंत्रालयानुसार व्हिएतनामला भारताचा मानवतावादी पाठिंबा आहे. ही मदत भारताच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीद्वारे चिन्हांकित दोन्ही देशांमधील टिकाऊ घनिष्ठ संबंधांचा पुरावा आहे असे म्हटले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममध्ये वादळ आल्यानंतर लगेचच व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांना सहानुभूती व्यक्त केली होती,” असेही म्हटले आहे.
India launches #OperationSadbhav.
Demonstrating our solidarity with the people affected by Typhoon Yagi, India is dispatching aid to Myanmar, Vietnam and Laos.
➡️ 10 tons of aid including dry ration, clothing and medicines left for 🇲🇲 onboard @indiannavy INS Satpura today.… pic.twitter.com/ooR0ipnxqI
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 15, 2024
लाओसमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे उत्तरेकडील भागात सुमारे 40,000 लोक प्रभावित झाले. लाओसला भारताने 8 दशलक्ष किमतीचा 10 टन मदत पुरवठा केला आहे. यामध्ये हायजीन किट, ब्लँकेट, मच्छरदाणी, झोपण्याच्या पिशव्या आणि जलशुद्धीकरण यंत्रणा यांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय नौदलाने देखील म्यानमारला मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. म्यानमारमध्ये भीषण पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर, यंगूनमधील ऑपरेशनसाठी विशाखापट्टणमहून भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पिण्याचे पाणी, रेशन आणि औषधांसह HADR पॅलेट्सची मदत पाठवण्यात यशस्वी लोडिंग पूर्ण झाले.