
Indian Embassy in Iran issued a renewed advisory amid escalating middle east tension
भारतीय दूतावासाने एक्सवर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील अलीकडील घडामोडी पाहता अस्थिरता प्रचंड पसरली आहे. यामुळे भारतीय नागरिकांनी सध्या सध्या इराणला प्रवास टाळावा. तसेच इराणमध्ये राहण्याऱ्यांना शक्यत तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवारी (०७ जून) रात्री उशिरा इराणने इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला चढवला होता. यामुळे दोन्ही देशांतील परिस्थिती अधिक चिघळली. इराणच्या या हल्ल्यावर प्रत्युत्तरात्मक कारवाई म्हणून इस्रायलने देखील सोमवारी (०८ जून) सकाळी इराणच्या सीमेबाहेरुन राजधानी तेहरानसह चार शहरांवर भीषण हल्ला केला.
इस्रायलने अलीकडेच केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये थेट संघर्षाला सुरुवात झाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरा, इस्फाहान, कराज आणि तब्रिझ यांसारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
सध्या वाढत तणाव पाहता भारतीय सरकार तेहरान आणि तेल अवीवमधील आपल्या दूतावासांच्या संपर्कात आहे. मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दूतावासाने भारतीयांना संयम बाळगण्याचे आणि जारी केलेल्या सुचनांचे पाल करण्याच आवाहन केले आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन्ही देशांना तातडीने हल्ले थांबवण्याची विनंती केली आहे. मात्र, इस्रायलने ट्रम्प यांच्या विनंतीला धुडकावून लावले असून इराणच्या आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील औद्योगिक क्षेत्रांवर जोरदार बॉम्बहल्ला केला आहे.
यामुळे अमेरिका इराण शांतता करार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जागतिक स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
pic.twitter.com/jWFDrdsAlz — India in Iran (@India_in_Iran) June 8, 2026