
Operation Sindoor
पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
पाकिस्तानने सुरुवातील स्वत:च्या विजयाचे दावे केले होते. परंतु भारतीय लष्कराने पुरव्यांसह सत्य परिस्थिती समोर आणली. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पाकिस्तानने भारताच्या DGMO कडे युद्धबंदीची विनंती केली. यानंतर १० मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली.
भारताच्या नौदलाचे अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी सांगितले की, ही मोहिम अजूनही सुरुच आहे.लष्कराने आपल्या धोरणांमध्ये आणि तैनातीमध्ये बदले केले आहेत. कोणत्याही क्षणी शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. अशा प्रकारच्या दहशवादी कारवाईला सहन केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.