Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानमध्ये दरवर्षी काश्मीर एकता दिवस साजरा केला जातो. १९९० मध्ये जमात-ए-इस्लामी च्या नेते काझी हुसेन अहमद यांनी हा दिवस मांडल होता, ज्याला तत्कालीन मुख्यमंत्री नवाझ शरीफ यांच्याकडून पाठिंबा मिळाला. याचा उद्देश भारतीय जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देणे होते. परंतु पाकिस्तान दरवर्षी या दिनादिवशी भारतविरोधी विष ओकून जगाचे लक्ष आपल्या कडे वेधण्याचा प्रयत्न करतो. काही तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान (Pakistan) या दिनाचा वापर दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कृत्यांना लपवण्यासाठी करतो. भारताने ५ ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यापासून तर पाकिस्तानी लष्कर आणि नेते काश्मीरचा मुद्दा तर अधिक आक्रमक पद्धतीने मांडत आला आहे. या दिवशी पाकिस्तान काश्मिर जनतेच्या हक्कांचा पुनरुच्चार केला जातो. पाकिस्तानमध्य आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते आणि विविध रॅली, चर्चासत्रांचे आयोजन करुन भारतविरुद्धी निदर्शने केली जातात. म्हणजे पाकिस्तानी धोरणाचा भाग राजकीय प्रपोगंडा म्हणून वापरला जातो.
आता प्रश्न उपस्थित होतो की यंदाही ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) अपयशावर पांघरुण घालण्यासाठी पाकिस्तान काश्मीर मुद्दाच्या वापर करुन जनतेला मुर्ख बनवणार का? गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये भारताने राबवलेल्या मोहिमेत पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिक दोन्ही पातळीवर नामुष्की सहन करावी लागली होती. भारताने या मोहिमेत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला होता. यानंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. सतत भारताविरोधी भाषेण करत आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून सभा आणि संत्रांचे आयोजन केला जता असून यामध्ये भारतविरोधी विष ओकले जात आहे. भारताला पुन्हा हल्ल्याची धमकी दिली जात आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचाही समावेश आहे.
पाकिस्तानने दरवर्षी काश्मीर एकता दिनानिमित्त काश्मीरच्या मुद्दांवरुन भारतविरोधी विधाने केली आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपस्थित केला आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान काश्मीर एकता दिन जागतिक स्तरावर डिसइफोर्मेशन कॅम्पेन म्हणजेच चुकीच माहिती लपवण्यासाठी करत आला आहे. यंदाही पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून झालेल्या परभवाला लपवण्यासाठी भारतविरोधी अपप्रचार करण्याची शक्यता आहे. भारताकडून पराभवानंतर पाकिस्तान जागतिक स्तरावर विश्वार्हता शून्य झाली आहे. अशा परिस्थिती पाकिस्तान काश्मिरी हक्कांच्या घोषणा देऊन स्वत:ला काश्मीर जनतेचा रक्षक प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. याचा वापर पाकिस्तानच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ५ फेब्रुवारीच्या आसपास काश्मीरबाबत पाकिस्तान ८५% या भारतविरोधी विष ओकण्याचा प्रयत्न करतो.
शिवाय पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत तणावाही सुरु आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बलुच आर्मीचा बंड, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरुन समर्थकांशी सुरु असलेल्या तणाव यांसारख्या अनेक मुद्यावर पडदा घालण्यासाठी काश्मीर एकता दिनाचा वापर करतील याची शक्यता नाकारता येत नाही.






