• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistans Stern Threat After Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack: ‘गौरी, गजनवी आणि 130 अण्वस्त्रे भारतासाठीच राखीव आहेत’, पाक रेल्वेमंत्र्यांचा धमकीचा सूर

Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 10:27 AM
Pakistan's Stern Threat After Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack: 'गौरी, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठीच आहेत', पाक रेल्वेमंत्र्यांचा धमकीचा सूर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pahalgam terror attack  : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे. या दहशतवादी कारवायांमध्ये २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला असून, हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारताने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारतर्फे उर्मट आणि आक्रमक भाषा वापरली जात आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, “जर भारताने आमचा पाणी पुरवठा थांबवला, तर आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत. आमच्याकडे गौरी, शाहीन, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व फक्त भारतासाठीच राखून ठेवली आहेत.”

भारताचे जलद प्रत्युत्तर, सिंधू करार रद्द आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने तत्काळ आणि ठाम कारवाई करत सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचबरोबर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देताना भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि शिमला करार अधिकृतपणे रद्द केला. या पावलांनी संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्याचे जाणवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर LoCवर गोळीबार; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

रेल्वे व्यवस्था लष्करी नियंत्रणाखाली : युद्धाची तयारी सुरू

हल्ल्यानंतर पाकिस्तानने देशातील संपूर्ण रेल्वे व्यवस्था लष्कराच्या ताब्यात दिली आहे. रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी सांगितले की, “सर्व रेल्वे स्थानकांवर लष्करी डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. रेल्वेची लॉजिस्टिक क्षमता आता थेट सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली आहे.” यामुळे गरज पडल्यास रणगाडे, जड शस्त्रास्त्रे आणि लष्करी सामग्री थेट रेल्वेमार्गे जलद गतीने हलवता येईल. अब्बासी पुढे म्हणाले, “आमचे अधिकारी पूर्ण सज्ज आहेत आणि लष्कराच्या प्रत्येक आदेशाचे तातडीने पालन केले जाईल.” या हालचालीमुळे पाकिस्तानची युद्धासाठी गंभीर तयारी सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः भारताच्या निर्णायक आणि आक्रमक पावलांनंतर पाकिस्तानच्या घाबरट आणि आक्रमक प्रतिक्रियांनी प्रादेशिक अस्थिरतेची भीती वाढवली आहे.

तणावाची पातळी वाढली, युद्धसदृश वातावरण

भारताने पहलगाम हल्ल्याच्या गंभीरतेची दखल घेत त्वरित कठोर पावले उचलली आहेत. सिंधू करार रद्द करणे आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानची लष्करी लॉजिस्टिक तयारी आणि अण्वस्त्रांची धमकी यामुळे संपूर्ण परिसरात युद्धसदृश तणाव वाढला आहे. विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानचा आक्रमक सूर त्याच्या अंतर्गत असुरक्षिततेचे द्योतक आहे. दहशतवादाला पाठीशी घालण्याचे परिणाम आता पाकिस्तानला भोगावे लागत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जंग करनी है तो…’ भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच ‘मीम अटॅक’, एकदा पहाच

 भारत ठाम, पाकिस्तान अस्थिर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयमाने पण कठोर भूमिका घेतली आहे, तर पाकिस्तानने उन्मादी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गौरी, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे’ अशा धमक्यांमुळे पाकिस्तानची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. भारताच्या ठोस कृतीमुळे पाकिस्तानला आता मोठा कोंडीत सापडण्याचा धोका आहे. दक्षिण आशियाच्या भविष्यासाठी हे अत्यंत निर्णायक क्षण आहेत. आगामी काळात भारत-पाकिस्तान संबंध कशा दिशा घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pakistans stern threat after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Pahalgam Terror Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
2

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे
3

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड; संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर केले भाष्य, म्हणाले..
4

भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड; संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर केले भाष्य, म्हणाले..

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा

TCS ने 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, NITES ने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला ‘हा’ दावा

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

Google Layoffs: एआयचा फटका! गुगलने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Google Layoffs: एआयचा फटका! गुगलने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.