स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाची कमान एका महिलेकडे देण्यात आली आहे. 2005 बॅचच्या IFS अधिकारी गीतिका श्रीवास्तव (Geetika Srivastava) इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या नवीन प्रभारी असतील. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तानने राजनैतिक संबंधांचा दर्जा कमी केला होता. म्हणजेच आता दोन्ही देशांमध्ये उच्चायुक्त नाहीत. यानंतर इस्लामाबाद आणि दिल्लीतील पाकिस्तानी आणि भारतीय उच्चायुक्तांचे नेतृत्व त्यांच्या संबंधित प्रभारी करत आहेत.
[read_also content=”नीट हिजाब न घातल्याने शिक्षकाने 14 मुलींच केलं टक्कल, कुटुंबियांचा शाळेत एकच गोंधळ, शिक्षकाचं निलंबन! https://www.navarashtra.com/world/teacher-cut-hair-of-school-girls-for-not-wearing-hijab-properly-outrage-in-indonesia-nrps-450829.html”]
गीतिका श्रीवास्तव 2005 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. च्या मूळची उत्तर प्रदेशच्या आहे. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इंडो-पॅसिफिक विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. गितीका चीनी (मंडारीन भाषा) बोलतात. गीतिका श्रीवास्तव यांनी यापूर्वी कोलकाता येथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या IOR विभागात संचालक म्हणून काम केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच त्या इस्लामाबादमध्ये पदभार स्वीकारणार आहे.
1947 मध्ये श्रीप्रकाश यांची पाकिस्तानमधील पहिले भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून भारताचे प्रतिनिधित्व नेहमीच पुरुषाकडे होते. इस्लामाबादमधील शेवटचे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया होते, ज्यांना 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर उच्चायुक्तालयाची स्थिती कमी करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर परत बोलावण्यात आले होते.