• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Now For Vedha Convention Nrdm

आता वेध अधिवेशनाचे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तीन - चार आठवड्यांवर आले. यंदा नागपूरच्या बोचर्‍या थंडीत होणार्‍या या अधिवेशनात चांगलीच गरमा-गरम चर्चा रंगणार आहे. राजधानी सोडून सरकार उपराजधानीत मुक्कामाला जाईल. तिथे राजकारणाचा फड रंगेल. दरवर्षीपेक्षा यावर्षी होऊ घातलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बर्‍याच मुद्यांमुळे वेगळे ठरणार आहे, अशी शक्यता सध्यातरी दृष्टीपथात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2023 | 06:16 AM
आता वेध अधिवेशनाचे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्याच्या आर्थिक राजधानीत निघून सरकार उपराजधानीच्या दारी जाईल. ७ डिसेंबरपासून सुरु होणार्‍या विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजतील, अशी शक्यता सध्या दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राज्यातील राजकारण आणि सरकारसमोरीला आव्हानांचा कसा सामना सत्ताधारी करणार, यावर पुढची बरीच गणिते अवलंबून असतील. विदर्भाला न्याय मिळावा यासाठी होणारे हे अधिवेशन यावेळी दररोज नव्या राजकीय डावपेचांना सत्ताधारी आणि विरोधक सामोरे जातील. दरवर्षीपेक्षाही विदर्भातील प्रश्‍न आणि राज्यातील मुद्दे अधिक गंभीर आहेत. त्यांच्यावर तोडगा काढणे सरकारला कितपत शक्य होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशन अधिकाधिक कालावधीसाठी चालवावे, ही प्रत्येक विरोधी पक्षाची मागणी असते आणि हे अधिवेशन केव्हा एकदाचे गुंडाळले जाते, याकडे सत्ताधार्‍यांचे. सत्ताधारी कोणीही असो किंवा विरोधक, हीच मानसिकता वर्षानुवर्ष पहायला मिळते. अधिवेशन एकदाचे गुंडाळले की नागपूरच्या बोचर्‍या थंडीत रंगलेल्या गप्पांच्या आठवणींसह सरकार मुंबई मुक्कामी परत फिरते.

यावेळीही हा मुद्दा उपस्थित होणार आहे. सत्ताधार्‍यांनी यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनाचे तीन आठवड्यांचे कामकाज जाहीर केले आहे. यातील पहिला आठवडा दोन दिवसांचा असेल. तर दुसरा आठवडा पाच दिवसांचा. सरकार समोरील आव्हाने आणि विरोधी पक्षांचा मूड पाहून तिसर्‍या आठवड्यात दोन दिवस की चार दिवस कामकाज चालवायचे, हे ठरवले जाईल. म्हणजे फारच फार हे अधिवेशनसुद्धा अगदी बारा, तेरा दिवसांपेक्षा अधिक चालणार नाही.

नागपूरातील अधिवेशन गांभीर्याने चालवा, किमान तीन आठवडे चालवा, अशी मागणी रेटून धरणारे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी पंधरा दिवस अधिवेशनाचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, असा एखादा अपवाद वगळता दहा – बारा दिवसांपेक्षा अधिक सरकार उपराजधानीत रमत नाही. यावेळीही तसेच अपेक्षित आहे.
महिनाभराचा अवधी असताना आतापासून अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटले. जानेवारीपर्यंतची मुदत त्यांनी दिली. पण उपोषण सोडवताना त्यांना दिलेल्या अनेक आश्‍वासनांपैकी मराठा आरक्षणाबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा करू आणि ठोस उपाययोजना करू, या आश्‍वासनाचाही समावेश आहे. जरांगे पाटलांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात धनंजय मुंडे यांचा समावेश होता, त्यांनी हे आश्‍वासन दिले. अर्थात सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाचे पालन करावे लागेल. हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर साधक – बाधक चर्चा घडवून आणावी लागेल. सरकारला अधिकृत भूमिका मांडावी लागेल. विरोधकांकडून हे आरक्षण देणे कसे अशक्य आहे, याची मांडणी होत असताना मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल आणि सरकारचे काय प्रयत्न आहेत, हे सभागृहात सांगावे लागेल. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांबाबत भूमिका घ्यावी लागेल. आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने येणारे अनेक मुद्दे, अडथळे आणि आव्हाने सरकारसमोर असणार आहेत.

मराठा आरक्षण हा एकमेव अडचणीचा मुद्दा नाही. सरकारची कोंडी करणारा मुद्दा यावेळी असेल तो राज्यातील दुष्काळ. राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. सरकारने तसा आदेश काढला. पण दुष्काळग्रस्त केवळ ४० तालुकेच नाहीत. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस कमी पडल्याने विहिरींचा तळ ऐन हिवाळ्यात दिसू लागला आहे. उन्हाळ्याची तर कल्पनाच केलेली बरी. खरिपातील पिके कमी पावसामुळे हातून गेली किंवा उत्पादन घटले. पाठोपाठ रब्बीचा हंगाम वाईट जाणार आहे, कारण जमिनीतील ओल आणि विहिरीतील पाणी आटले आहे. धरणातील पाण्यावर पिण्याचे आरक्षण पडेल, तेवढेच त्यात पाणी आहे.

हिवाळ्यानंतर दुष्काळाच्या झळा सुरु होतील, त्या प्रत्यक्ष शेतात, गावांमध्ये, खेड्यांमध्ये. पण संभाव्य दुष्काळाची धग सरकारला सभागृहात सोसावी लागेल. संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करा ही मागणी सुरुवातीपासून सुरु झाली आहे. शेतकर्‍यांच्या मदतीचे निकष सरकारने नुकतेच बदलले असले तरीही ते पुरेसे नाहीत. शेतकर्‍यांना मदत आणि दुष्काळी उपाययोजना यासाठी सरकारला तयार रहावे लागेल.

तिसरा आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित होईल तो राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा. मराठा आंदोलनाच्या दरम्यान लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान हे मुद्दे उपस्थित होतील. यासह उपमुख्यमंत्र्यांनी सांगीतलेले जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील गुन्ह्यांचे काय, हा प्रश्‍नही कदाचित उपस्थित होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून दिसतो आहे. त्यांनीही त्याचे सुतोवाच केले आहे. जातीमुळे सॉफ्ट टार्गेट असल्याचेही ते बोलले होते, असे ऐकीवात आहे. पण त्यापेक्षाही त्यांच्या भोवती सत्ता फिरते आहे. तेच सगळे काही डावपेच करताहेत. केंद्राच्या दृष्टीने आजही तेच मुख्यमंत्री आहेत. संपूर्ण प्रशासन तेच सांभाळताहेत, असा एक मेसेज लोकांमध्ये गेलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे असले तरीही फडणवीस यांचेच नियंत्रण आहे, या सत्याचे दुष्परिणाम म्हणून त्यांनाच टार्गेट केले जाते. ही जबाबदारी तर त्यांना स्वीकारावीच लागेल. ती स्वीकारत असतानाच विरोधकांच्या सगळ्या आरोपांना उत्तरे देऊन सभागृहाचे कामकाज पूर्णवेळी सुरु राहिल याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे.

राज्यातील या सगळ्या विषयांकडे लक्ष देताना, त्याच्या आडून सुरु असलेले राजकीय डावपेच निष्प्रभ करतानाच विदर्भातील स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढच्या अधिवेशनाच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु असेल, लोकसभेच्या निवडणूका पार पडलेल्या असतील. त्या दृष्टीनेही या अधिवेशनाला विशेष महत्व आहे. गेल्या निवडणुकीत ज्या विदर्भाने भाजपच्या झोळीत दान टाकताना कंजुषी केली, त्या भागातील प्रश्‍नांना फार गांभीर्याने घ्यावे लागेल. खरी कसोटी हा सगळा समतोल सांभाळण्याची असेल. तो समतोल अर्थातच उपमुख्यमंत्र्यांनी साधावा, ही सर्वसामान्यांची अपेक्षा. त्यामुळेच अधिवेशनाचे वेध आत्तापासूनच लागले आहेत. सरकारचा दोन आठवड्यांसाठी मुक्काम हलविण्याची तयारी सुरु आहे, तशीच राजकीय सारीपटाचीही मांडणी झालीय.

– विशाल राजे

Web Title: Now for vedha convention nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2023 | 06:16 AM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Manoj Jarange
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Winter Session

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.