भारतात मे महिन्यात सुरु होणार खासगी सोन्याची खाण (फोटो सौजन्य - iStock)
इंग्रज येण्याआधी भारताला सुवर्णपक्षी म्हटले जायचे. मात्र नंतर सोन्याची वाताहतच होत गेली असं म्हटलं जातं. सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत आणि सामान्य माणसासाठी सोनं विकत घेणं हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे झालं असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता पुन्हा सोनं हे भारतातून मोठ्या प्रमाणात आयात होऊ शकतं.
जोन्नागिरी प्रकल्प सुरू
भारत सर्वाधिक तेलाची आयात करतो, त्यानंतर सोन्याचा क्रमांक लागतो, जी अंदाजे वार्षिक ८०० ते १००० टन असते. या मोठ्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर परिणाम होतो. आता भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणकामास सुरुवात होणार असल्याने, सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकते. २००० साली कोलार गोल्ड फील्ड्स बंद झाल्यापासून सोन्याच्या आयातीत आणखी वाढ झाली आहे.
Middle Class साठी अक्षय तृतीयाचा स्पेशल ‘Budget Plan’, Loan न घेता अशी खरेदी करा Gold Jwellary
क्षमता काय आहे?
पहिल्या वर्षी उत्पादन प्रति वर्ष ४००-५०० किलोग्रॅम असण्याची अपेक्षा आहे. तथापि, पुढील काही वर्षांत उत्पादन क्षमता १,००० किलोग्रॅमपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आता पुढील १५ वर्षांसाठी प्रति वर्ष १,००० किलोग्रॅम सोन्याच्या क्षमतेने कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे.






