
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
New Threat For India:मध्य पूर्वेतील युद्धामुळे महागाईला मोठा धोका निर्माण होईल असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे आणि तसेच घडलं. या सगळ्यात होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आणि जागतिक तेल आणि वायू संकट अधिकच गडद झाले, ज्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि अगदी एलपीजीच्या किमतीही कडाडल्या. वाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाईत मोठी वाढ झाली. हे सर्व कच्च्या तेलाच्या किमतीतील प्रचंड वाढीमुळे घडले. त्याचा परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात दिसून आला. पण आता यापेक्षा मोठं संकट घोघावत आहे. त्यामुळा भारतीयांना चांगलाच दणका बसणार आहे. नेमकं कोणतं आहे हे संकट आणि काय परिणाम होणार ? हे सविस्तर जाणून घेऊयात मात्र खलनायकाचं पात्र कसं बदलत गेलं हेही जाणून घेऊयात.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेला तडा गेल्याने आणि दोन्ही देशांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने, कच्चे तेल आता ‘खलनायक’ राहिलेले नाही. अमेरिका-इराण शांतता कराराच्या घोषणेपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. यामुळे महागाईचा धोकाही कमी झाला आहे, कारण होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल पुरवठा साखळीतील अडथळे दूर होत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीच्या परिणामाबद्दल बोलायचं तर देशाचा किरकोळ महागाई दर एप्रिलमधील ३.४८% वरून मे महिन्यात ३.९३% पर्यंत इतका वाढला. यामध्ये अन्नधान्याच्या किमतीतील वाढ आणि इंधनाच्या दरवाढीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, घाऊक महागाई दरही मे महिन्यात ९.६८% वर पोहोचला. वाढता ऊर्जा खर्च आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२७ साठीचा आपला महागाईचा अंदाज ४.६% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात बराच काळ प्रति बॅरल १००-११० डॉलरच्या वर घिरट्या घालत असलेले आणि जगाला महागाईचा धोका निर्माण करणारे कच्चे तेल, अमेरिका-इराण शांतता कराराच्या घोषणेमुळे मोठ्या प्रमाणात कोसळले, ज्यामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ७७ डॉलरपर्यंत घसरल्या. त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेत असलेलं कच्च तेल आणि चांगलंच नरमलं आहे.
काही आठवड्यांपूर्वीपर्यंत महागाईची चर्चा कच्च्या तेलाभोवती केंद्रित होती, परंतु आता तज्ज्ञांचे मत आहे की खलनायक कच्चे तेल नसून कोणीतरी दुसरेच आहे, ज्याचा गंभीर धोका आपल्या अगदी जवळून निर्माण होऊ शकतो. इन्फोमेरिक्स रेटिंग्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी स्पष्ट केलं की, आज भारतातील महागाईसाठी सर्वात मोठा धोका तेल नसून मान्सून आहे.
त्यांनी सांगितले की, कच्च्या तेलापेक्षा मान्सूनच्या गैरहजेरीमुळे भारताला महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचे सोपे कारण म्हणजे भारतातील महागाईच्या गणनेत इंधनाच्या किमतींपेक्षा खाद्यपदार्थांची भूमिका अधिक मोठी असते. भारतातील जवळपास निम्मी शेतीयोग्य जमीन पावसावर अवलंबून आहे, पावसाच्या कमतरतेमुळे धान्य, कडधान्ये, भाजीपाला, फळे आणि तेलबिया यांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे महागाईचा दर झपाट्याने वाढू शकतो आणि कौटुंबिक बजेटची घडी विस्कळीत होऊ शकते.
शर्मा म्हणाले की, कमी पावसामुळे, विशेषतः एल निनोच्या काळात, अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती खर्चात लक्षणीय वाढ होते. कमी पावसामुळे भाजीपाला, कडधान्ये, खाद्यतेल आणि दुधाच्या किमती अनेकदा दुहेरी अंकात पोहोचतात. एका मध्यमवर्गीय शहरी कुटुंबासाठी, यामुळे मासिक खर्चात ₹१,००० ते ₹३,००० ने वाढ होण्याचा अंदाज आहे, तर कमी उत्पन्न असलेली कुटुंबे अधिक असुरक्षित आहेत, कारण त्यांच्या खर्चाचा मोठा भाग अन्नावर खर्च होतो.
Telegram ला दिल्ली हायकोर्टाचा दणका! याचिका फेटाळत दिला ‘हा’ मोठा निर्णय