भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास (Photo Credit- X)
पीयूष गोयल म्हणाले की, “आज देशभरातील प्रत्येक नागरिक या उत्कृष्ट व्यापार कराराबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आहे. १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. त्यांनी काल असा एक करार अंतिम केला आहे जो भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि प्रत्येक गरीब व्यक्तीला प्रगतीची प्रचंड संधी देईल. हा करार केवळ व्यवहाराचा भाग नसून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.”
या कराराच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना गोयल यांनी सांगितले की, “आमची टीम अनेक महिन्यांपासून अमेरिकेसोबत सतत वाटाघाटी करत होती. अनेक गुंतागुंतीच्या समस्या होत्या आणि ५० टक्क्यांपर्यंत कर आकारणीचे मोठे आव्हान होते. प्रत्येकजण या त्रासातून जात होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबतच्या मैत्रीच्या आधारे भारताच्या हिताला जगासमोर ठामपणे मांडले आणि ते साध्य करून दाखवले.”
वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केले की, या करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. “पंतप्रधान मोदींनी नेहमीच कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेसोबतच्या या व्यापार करारातही त्यांनी भारतीय शेती आणि दुग्धव्यवसायाचे पूर्ण संरक्षण केले आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कोणताही फटका बसणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
पीयूष गोयल यांच्या मते, या करारामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) अमेरिकेसारखी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे. कापड (Textile), दागिने (Jewelry) आणि सागरी उत्पादने (Marine Products) या क्षेत्रांना आता अमेरिकेत आपले सामान विकण्याची प्रचंड संधी मिळेल. तसेच, आता गावातील लहान उद्योजकांचे सामानही थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. पंतप्रधान मोदींच्या मैत्रीचा आदर राखत हा सर्वोत्तम व्यापार करार दिल्याबद्दल गोयल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले.
यावेळी पीयूष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल गांधींसारखे नकारात्मक विचार असलेले नेते आज देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते केवळ खोटेपणा आणि फसवणुकीच्या नावाखाली लोकांना भडकवत आहेत. त्यांचा देशाच्या प्रगतीशी काहीही संबंध नाही. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, पण राहुल गांधींना यात रस नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?






