भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया (Photo Credit- X)
या कराराचे स्वागत करताना भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले:
भारत-अमेरिका व्यापार करार हा दोन्ही राष्ट्रांसाठी एक बहुप्रतिक्षित आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो गुंतवणूक आणि विकासासाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देईल. मुक्त व्यापार करारांची ही मालिका जागतिक चौकटींमध्ये भारताच्या मध्यवर्ती भूमिकेची पुष्टी करते, ज्याचा उद्देश लवचिक आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धती निर्माण करणे हा आहे.
१. रशियाकडून तेल खरेदी बंद: या करारातील सर्वात मोठी अट म्हणजे भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवेल. त्याऐवजी, भारत अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे.
२. करांमध्ये कपात: अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील अतिरिक्त कर २५ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
३. मोठी खरेदी: ‘बाय अमेरिकन’ धोरणांतर्गत भारत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलर्स किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान, कोळसा आणि कृषी उत्पादने खरेदी करेल.
४. कर अडथळे दूर होणार: भारतानेही अमेरिकन उत्पादनांवरील सर्व कर आणि तांत्रिक अडथळे हळूहळू दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
५. निर्यात वाढ: अमेरिकेने कर कमी केल्यामुळे भारतीय कापड, आयटी सेवा आणि औषध निर्माण (Pharma) क्षेत्रातील निर्यातीला मोठी गती मिळणार आहे.
IGI कडून AGLचे संपादन; रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये जागतिक स्तरावर नवा अध्याय
कापड उद्योग (Textile): अमेरिकन बाजारपेठेत भारतीय कपडे स्वस्त झाल्यामुळे निर्यातीत मोठी वाढ होईल.
आयटी आणि तंत्रज्ञान: उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांच्या देवाणघेवाणीमुळे भारतीय आयटी कंपन्यांना मोठे जागतिक प्रकल्प मिळतील.
फार्मा क्षेत्र: जेनेरिक औषधांवरील कर कमी झाल्याने भारतीय औषध कंपन्यांची अमेरिकेतील पकड अधिक मजबूत होईल.
ऑटो पार्ट्स आणि दागिने: ७ टक्के कर कपातीमुळे ऑटो पार्ट्स कंपन्यांचा नफा वाढेल, तर दागिने आणि लेदर उद्योगाला मोठा दिलासा मिळेल.
या ऐतिहासिक कराराच्या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये जवळपास १,००० अंकांची वाढ नोंदवण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, हा करार भारताला चीनच्या तुलनेत अमेरिकेचा सर्वात विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून स्थापित करेल, ज्यामुळे भारताच्या जीडीपी (GDP) वाढीला नवीन वेग मिळेल.
India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?






