
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फेब्रुवारीमध्ये सुरू झालेले इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता संपलं आहे. पण जितकं सहज बोलतो तितकं सहज हे युद्ध संपलेलं नाही. त्या देशांसह इतर देशांवरही किंबहून जागतिक स्तरावरही अवघ्या काही महिन्यांत गंभीर परिणाम झाले आहे. परिणामी, भारताला तेल आणि वायूच्या तुटवड्याचा सामना करावा लागला, तसेच रुपयाही कमकुवत झाला. रुपया कमकुवत होत असताना डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे जनतेसमोरही मोठी समस्या निर्माण झाली त्याचं सगळ्यात मोठं स्वरुप ते म्हणजे महागाई. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार आता तगडा प्लॅन बनवत आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने WGC मंगळवारी एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, जगभरातील मध्यवर्ती बँका पुढील पाच वर्षांत आपला सोन्याचा साठा वाढवण्याची शक्यता आहे. सोन्याचा साठा जसजसा वाढत जाईल, तसतसा डॉलरच्या साठ्याचा वाटा कमी होईल. WGC च्या ‘सेंट्रल बँक गोल्ड रिझर्व्ह सर्व्हे’नुसार ८४% मध्यवर्ती बँकांचा असा विश्वास आहे. केवळ भारताची RBI नाही, तर इतर ७२ देशांच्या मध्यवर्ती बँकासुद्धा असे करण्याचा मास्टर प्लॅन बनवत आहेत.
WGC च्या अहवालानुसार, सोन्याचा साठा वाढल्यास डॉलरच्या साठ्यात किंचित घट होईल. या सर्वेक्षणादरम्यान, जेव्हा अनेक मध्यवर्ती बँकांची याविषयी मुलाखत घेण्यात आली, तेव्हा त्यापैकी ७४% बँकांनी सांगितले की पुढील पाच वर्षांत डॉलरचा साठा कमी होईल. १५% बँकांनी सांगितले की कोणताही बदल होणार नाही. तर, ११% बँकांनी सांगितले की साठ्यामध्ये डॉलरचा वाटा वाढेल.
नवीन आकडेवारीनुसार, RBI कडे सध्या ८८०.५२ मेट्रिक टन सोने आहे. जून २०२६ मध्ये, RBI ने जाहीरपणे सांगितले होते की त्यांनी सोन्याचा साठा कमी केलेला नाही आणि त्यांचा प्रत्यक्ष सोन्याचा साठा ८८०.५२ टन इतकाच आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे. भारत काही काळापासून आपल्या परकीय चलन साठ्यातही सोने ठेवत आहे. जर WGC चा अहवाल खरा ठरला, तर भविष्यात सोन्याचा साठा आणखी वाढेल.