जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोरनार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत संतापलेल्या पतीने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनंतर अपराधी भावनेतून त्याने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मृतकाचे नाव आनंदा महारू धनगर (४२) असे नाव आहे.
महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बोरनार येथील नवीन प्लॉट भागात आनंदा धनगर हा पत्नी रेखा तसेच विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह वास्तव्याला होता.आनंदा धनगर आणि त्याची पत्नी रेखा यांच्यामध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत असत. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी देखील आनंदा याने दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी जोरदार वाद घातला. या वादाचे रुपांतर नंतर हिंसाचारात झाले. संतापलेल्या आनंदाने कुऱ्हाड उचलून पत्नीवर निदर्गीपणे वार केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर आता जळगावमध्ये रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नेहमीचे भांडण असेल म्हणून त्याकडे शेजाऱ्यांनी थोडे दुर्लक्ष केले. परंतु, त्या वादाचे पर्यावरण हादरून टाकण्याऱ्या घटनेत झाला.
पत्नी रेखावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आनंदा हा संतापात घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो जळगाव-मनमाड रेल्वे मार्गावरील म्हसावद स्थानकापासून जवळच असलेल्या फाटकावर गेला. तिथे कोणाचे लक्ष नसताना त्याने सकाळी सातच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना काही वेळाने लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ रेल्वेसह औद्योगिक वसाहत पोलीसांना माहिती दिली.जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. जळगाव औद्योगिक वसाहत ओलीस ठाण्यात तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात रवाना केला. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
पुण्यात वैष्णवी
गेल्या काही महिन्याखाली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. वाकडमधील W-57 सोसायटीत दिव्या सूर्यवंशी यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही आत्महत्या नसून खून असून, तिच्या पतीसह सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि खून केला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिव्या हर्षल सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत 26 वर्षीय दिव्या हर्षल सूर्यवंशी हिचा राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दिव्याचे पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि सासरच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप