काय घडलं नेमकं?
१७ फेब्रुवारीच्या रात्री नऊच्या सुमारास कोल्हान सिंकू हे आपली पत्नी ज्योती आणि मुलांसह घरात झोपले होते. तेव्हा गावातील एका नातेवाईकांने त्यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. आधी पासून तिथे 10-12 जण जमा होते. कोल्हान आणि त्यांची पत्नी अंगणात येताच त्यांनी गोंधळ सुरु केला. जमावाने ज्योतीला ‘डाकिण’ असल्याचे आरोप केले. तिच्यामुळे गावात वाईट गोष्टी होत असल्याचा देखील आरोप केला. कोल्हान यांनी सकाळी पंचायत बसवून निर्णय घेऊ अशी विनवणी केली, मात्र संतापलेल्या जमावाने त्यांचे काहीही ऐकले नाही.
पेट्रोल टाकून जाळले
या जमावातील एकाने पेट्रेलचा कॅन काढून संपूर्ण कुटुंबावर पेट्रोल ओतला आणि माचिस पेटवून त्यांना आग लावून दिली. संपूर्ण कुटुंब आगीत जळाला लागला. सिंकू यांनी कसेबसे तिथून पळ काढत जळणारे कपडे फेकून देत जीव वाचवला. ते मदतीसाठी रात्रीच पोलीस ठाण्यात पोहोचले, मात्र रात्रभर त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. दरम्यान त्यांची पत्नी आणि दोन महिन्यांचा बाळ या आगीत पेटून होरपळून मृत्यू झाला होता.
१० ते १२ जणांचा समावेश
बुधवारी सकाळी त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मायलेकांचे जळालेले मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. प्राथमिक तपासात या गुन्ह्यात सुमारे दहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. पोलिसांनी काही संशयितांचे जबाब नोंदवले असून आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: 32 वर्षीय महिला आणि तिचे दोन महिन्यांचे बाळ.
Ans: सुमारे दहा जणांचा सहभाग असल्याचा संशय.
Ans: मृतदेह ताब्यात; संशयितांचा शोध सुरू.






