मुंबईत एटीएसने (Anti-Terrorism Squad) एका मोठ्या कारवाईत बनावट कागदपत्रांसह राहणाऱ्या ४ बांगलादेशी दहतशवाद्यांना अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय एटीएसने आणखी ५ बांगलादेशींची ओळख पटवली असून, त्यांचा शोध सुरू आहे. तसेच बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली असल्याने आरोपींनी लोकसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे एटीएसने उघड केले आहे.
या प्रकरणी एटीएसने आयपीसीच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ आणि भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ (१ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू युनिटने अलीकडेच रियाझ हुसैन शेख (33), सुलतान सिद्धियाऊ शेख (54), इब्राहिम शफीउल्ला शेख (44) आणि फारुख उस्मांगनी शेख (39) यांना अटक केली आहे.
हुसेन शेख हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. त्याने सांगितले की, आरोपी मूळचे बांगलादेशचे असून ते शहरातील वेगवेगळ्या भागात राहत होते. अनेक वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असल्याच्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. अटक केलेल्यांव्यतिरिक्त आणखी पाच जणांनी अशाच पद्धतीने पासपोर्ट मिळवले होते आणि त्यापैकी एक जण कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता, असेही समोर आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, अटक आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले असून ते दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील होते की नाही हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे यापूर्वी 7 जून रोजी पोलिसांनी ठाण्यात नऊ बांगलादेशी महिलांना बनावट कागदपत्रांसह अटक केली होती. या महिलांना मदत केल्याप्रकरणी आणखी एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.






