अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आनंदनगर भागात विजेच्या खांबात करंट उतरून एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रीती किरण गांगुर्डे असे मृत मुलीचे नाव असून, खेळताना खांबाला हात लागल्याने तिला विजेचा तीव्र शॉक बसला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या खांबाबाबत गेल्या वर्षभरापासून तक्रार करूनही महावितरणने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आनंदनगर भागात विजेच्या खांबात करंट उतरून एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रीती किरण गांगुर्डे असे मृत मुलीचे नाव असून, खेळताना खांबाला हात लागल्याने तिला विजेचा तीव्र शॉक बसला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या खांबाबाबत गेल्या वर्षभरापासून तक्रार करूनही महावितरणने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.






