Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: निसर्गाचा तडाखा अन् कांद्याची भावघसरण; कर्जबाजारी शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील राहुड येथे कांद्याला कमी भाव, पिकांचे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे 59 वर्षीय शेतकरी गुलाब निकम यांनी गळफास घेत जीवन संपवलं. बदलत्या हवामानाचा फटका आणि आर्थिक विवंचनेमुळे ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 10:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कांदा पिकाचे नुकसान आणि कमी बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत.
  • कर्जाच्या वाढत्या बोजामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.
  • घटनेनंतर शेतकऱ्यांकडून हमीभाव आणि अनुदानाची मागणी.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातून पुन्हा एकदा शेतकरी संकटाची वेदनादायक घटना समोर आली आहे. बदलते हवामान, कांद्याची भावघसरण आणि वाढत चाललेला कर्जाचा बोजा यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. ही घटना राहुड गाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

काय घडलं नेमकं?

गुलाब केशव निकम (वय 59) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा उदरनिर्वाह तीन एकर सशेतीवर चालत होते. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. एकीकडे पिकाचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. याच नैराश्यातून त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव द्या, कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे.

नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टर खाली चिरडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू असताना आणि न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शेतात दोनही बाजूंमध्ये वाद झाला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना ट्रॅक्टरची धडक बसल्याचे आरोप करण्यात येत आहे. घडलेली घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये घडली.

या प्रकरणातील जखमी झालेल्या महिलांची नावे रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी असे आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भावबंदकीच्या जमीन वादातून ही घटना घडली. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी याला महिलांनी विरोध केला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. तेव्हा महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टर खाली शिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत शेतकऱ्याचे नाव काय होते?

    Ans: गुलाब केशव निकम असे मृत शेतकऱ्याचे नाव होते.

  • Que: आत्महत्येमागचे प्रमुख कारण काय होते?

    Ans: कांद्याला कमी भाव, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे होती.

  • Que: शेतकऱ्यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?

    Ans: कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव आणि 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

Web Title: Nashik crime natures fury and plunging onion prices indebted farmer ends his lifes journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना
1

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप
2

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

Beed Crime: दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप
3

Beed Crime: दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप

Latur Crime: माझा पेपर चांगला गेला होता…,मात्र पेपरफुटीनंतर तणाव वाढला आणि विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
4

Latur Crime: माझा पेपर चांगला गेला होता…,मात्र पेपरफुटीनंतर तणाव वाढला आणि विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.