
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती. यावरून सासू सुनेचा वाद होत होता. सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. त्यानंतर त्या बाटलीतलं विष सुनेने सासूच्या पाणी भरलेल्या कळशीत ओतली. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र पाण्याची चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यांनतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या.
समाधानाला रात्री उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना अनैतिक संबंधातून घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवेला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींवर काठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त लोहार समाजाने आज पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या
सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका 39 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वंडरलँड सिटी शेजारील एका बिअर शॉपीजवळ घडली आहे. मृत तरुणाचे नाव शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39) असे आहे. चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याच वादाचा रूपांतर हत्येत झाला.
35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले
Ans: सासूला मारण्यासाठी कळशीत विष मिसळले; मात्र तेच पाणी पिल्याने पतीचा मृत्यू झाला.
Ans: मृताच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने कट रचल्याचा आरोप.
Ans: पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले; पोलीस कोठडी मंजूर.