शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचारासाठी कंबर कसली असून सभा, रॅली आणि घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सगळ्या राजकीय गदारोळात खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी निलेश महाडीक यांनी केला आहे.






