• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Congress Leader Dhiraj Deshmukh Hits Out At Bjp At Latur Rally

‘महायुती सरकार लाडकं नव्हे तर लबाड…’, विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 11, 2024 | 12:54 PM
विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा

विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Dhiraj Vilasrao Deshmukh Speech in Latur : राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये काँग्रेसची सभा झाली असून या सभेत भाजपवर हल्लाबोल केला असून महायुती सरकारने फक्त भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार यात महाराष्ट्र एक नंबरवर नेऊन ठेवला आहे. हे लाडकं नाही तर लबाड सरकार आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या संस्थापक अध्यक्षा दीपशिखा देशमुख, स्वयंप्रभा पाटील, सुनिता आरळीकर, आशा भिसे, शिला पाटील, दैवशाला राजमाने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हे सुद्धा वाचा: महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धिरज भैय्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या भाषणाचेही कौतुक केले. धिरजभैय्यांना पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात ऐकले. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाला माझा मानाचा मुजरा, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. तसेच महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी विचाराची आहे. परंतु भाजपने महाराष्ट्रातील पक्ष फोडले, घर फोडले. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेले, नेते गेले, महामंडळे गेली, सगळे गेले. परंतु जनता आमच्यासोबत राहिली आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले. या सरकारने फक्त घरे फोडली नाहीत तर येथील उद्योग इतर राज्यात पळवून नेले. आमच्या बेरोजगारांच्या ताटातला घास हिसकावण्याचे पाप यांनी केले असल्याची जहरी टीका त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाने देशाला इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधान दिल्या. राजकारणात महिलांसाठी सोनिया गांधी यांनी ५० टक्के आरक्षण दिले. लातूर काँग्रेसने सुद्धा आरक्षण नसताना महिलांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद, महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर, कारखान्याच्या चेअरमन, बँकेत संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

विलासरावांना अभिमान वाटला असता..

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय विलासराव देशमुखसाहेबांची आठवण काढून त्यांना अभिवादन केले. या मातीने खूप मोठा सुपुत्र महाराष्ट्र दिला आहे. आदरणीय वैशालीताई यांची त्यांना साथ होती. आदरणीय साहेबांचे विचार, त्यांचा आदर्श, समर्थ वारसा त्यांचे तीन सुपुत्र या ठिकाणी चालवत आहेत. धिरजभैय्यांचे अप्रतिम भाषण ते एक आदर्श लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. त्यांनी ज्या-ज्या मागण्या केल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या मी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सरकारचा शपथविधी झाल्यावर पहिल्या १०० दिवसांत सगळ्या मागण्या पूर्ण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.

हे लाडकं नव्हे लबाड सरकार- धिरज देशमुख

भाजपने अदृश्य शक्तीच्या माध्यमातून महायुतीचे सरकार जनतेवर लादले आहे. परंतु आमच्यावर आई तुळजाभवानी व महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी निवडून येणार आहे, असा विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त करत काँग्रेसने काय केले असा प्रश्न विरोधक विचारतात. परंतु, दहा वर्षांमध्ये राज्य सरकारने व केंद्र सरकारने काय केले हे सांगा असा जाब त्यांनी विचारला. महायुती सरकारने फक्त भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार यात महाराष्ट्र एक नंबरवर नेऊन ठेवला आहे. हे लाडकं नाही तर लबाड सरकार आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दिल्लीप्रमाणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा व्हाव्यात, आरोग्य व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र, बचत गटाला शून्य टक्के व्याज, ग्रामपंचायतीमध्ये महिलांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करणे तसेच बचत गटांना शासनाच्या विविध वस्तू निर्मितीमध्ये सहभाग वाढविणे, गावामध्येच केजी टू पीजी शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न करण्याची विनंती केली.

भाजपमुळे विकृत मानसिकता वाढली- प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जिजाऊ, सावित्रींचा, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र जो पुरोगामी विचारधारेवर चालतो, त्या महाराष्ट्रामध्ये आज चार-चार वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार आणि अन्याय होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण म्हणून महिलांना तीन हजार रुपयांची लाच देत आहेत. तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीच्या चिमुरडीवर अन्याय, अत्याचार होतात. ही विकृत मानसिकता भाजपमुळे वाढली आहे. भाजप यासाठी दोषी असल्याचा आरोप करत भाजपला आता मते मागण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे पुढे म्हणाल्या, भाजपने निवडणुकीच्या तोंडावरच ही लाडकी बहीण चालू कशी केली. मागच्या तीन वर्षात लाडक्या बहिणाचा का विसर पडला होता? असा सवाल केला. ते आधी टेबलाच्या खालून पैसे द्यायचे आता टेबलाच्या वरून पैसे देत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

हे सुद्धा वाचा: 77 वर्षानंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात पहिल्यांदाच मतदान केंद्रावर होणार मतदान

Web Title: Congress leader dhiraj deshmukh hits out at bjp at latur rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 12:53 PM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ
2

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
3

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
4

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.