नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सोडून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांनी याबाबत ‘राजकीय’ निरोप दिल्यानेच ते तत्काळ दिल्लीला गेले असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. इन्फाळ येथून सुरू झालेली ही यात्रा गुरुवारी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दाखल झाली.
बंगालमध्ये प्रवेश करताच काही तासांतच सोनिया गांधी यांचा निरोप मिळाला असल्याची माहिती काँग्रेस सूत्राने दिली. राहुल गांधींनी कूचबिहारमध्ये रोड शो केला आणि तथापि, यात्रेच्या प्रवासात दोन दिवसांचा ब्रेक असल्याने ते दिल्लीला रवाना झाले, असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते शुभंकर सरकार यांनी दिली.
28 जानेवारीला यात्रा पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत गांधी परत येतील आणि हजेरी लावतील. विश्रांतीनंतर ही यात्रा पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंग जिल्ह्यातून जाईल, असे त्यांनी सांगितले.






