पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : पाथरी : नगर परिषद पाथरीच्या २७ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणे व गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी स्वीकृत सदस्य बाबाजानी (अब्दुल्ला) दुर्राणी यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
ते विधानसभा व विधान परिषदेचे माजी आमदार असून यावेळी पाथरी नगर परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांना पुढील दोन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आले असून, १० दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास अपात्रतेची कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. (Political News)
नगर परिषदेच्या नोटीसनुसार, सभेच्या कार्यसूचीतील विषयांना बगल देत दुर्राणी यांनी असंबंधित मुद्द्यांवर वारंवार बोलून सभेचे कामकाज विस्कळीत केले. अध्यक्षांची परवानगी न घेता मोठ्याने बोलणे, गोंधळ घालणे तसेच अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
हे देखील वाचा : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
अरेरावीची भाषा वापरली
सभेदरम्यान अधीक्षकांशी अरेरावीची भाषा वापरल्याची नोंद असून, – हा संपूर्ण प्रकार कॅमे-यात कैद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, “स्वीकृत सदस्य असूनही निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणे – मतदान घेण्याचा आग्रह धरण्याचा ठपकाही नोटीसमध्ये ठेवण्यात – आला आहे. याशिवाय, सभा संपल्यानंतरही दुर्राणी व त्यांच्या – गटातील काही सदस्यानी मुख्याधिकारी यांच्या वतीने काम पाहणारे – अधिकारी व सभा अधीक्षक यांच्याशी दमदाटी करून सुमारे अर्धा – तास वाद घातल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे सभागृहाची प्रतिमा मलिन झाली असून अधिकारी-कर्मचा-यांचे मनोबल – खच्चीकरण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सदर प्रकरणी – महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 व संबंधित नियमांनुसार ही – कारवाई करण्यात आली असून पुढील काळात वर्तनात सुधारणा न झाल्यास अधिक कठोर पावले उचलली जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हे देखील वाचा : “राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर
नगराध्यक्षांना नोटीस देण्याचा अधिकारच नाहीः दुर्राणी
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “नोटीस देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे दिलेली नोटीस चुकीची असून, त्या नौटिसीवर आधारित प्रसिद्ध झालेल्या बातम्या खोडसाळपणाच्या आहेत. ‘ज्या दैनिकांनी अशा प्रकारच्या बातम्या छापल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे.” असे मत त्यांनी मांडले.






