आता RBI बँकेला बॉम्बनं उडवण्याची धमकी, रशियन भाषेत आला ई-मेल (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. पण, नंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. सध्या 500, 200 आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा चलनात पाहिला मिळत आहेत. असे असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नव्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे. मात्र, त्यांच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक नवीन गर्व्हनरच्या नियुक्तीनंतर त्यांची स्वाक्षरी असलेले नोट्स जारी केले जातात.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, जुन्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वैध राहतील आणि त्या बदलल्या जाणार नाहीत. या नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध होतील. लोक रोख रक्कम कुठे सर्वात जास्त वापरतात. यासोबतच, 2000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर भारतात रोख प्रवाह कसा होता हे देखील आपल्याला समजेल.
डिजिटल व्यवहारातही झाली वाढ
देशात सध्या रोख रकमेचे चलन पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2017 मध्ये रोख चलन 13.35 लाख कोटी रुपये होते, तर मार्च 2024 पर्यंत ते 35.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. याशिवाय, यूपीआयद्वारे डिजिटल व्यवहार देखील वेगाने वाढत आहेत. मार्च 2020 मध्ये, यूपीआय व्यवहार 2.06 लाख कोटी होते, तर फेब्रुवारी 2024 पर्यंत ते 18.07 लाख कोटींवर पोहोचले आहे.
दिल्लीत चालू वर्षात सर्वाधिक काढली गेली रक्कम
दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळं लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात.