विजय रॅली चेंगराचेंगरीवर तामिळनाडूचे डीजीपी जी. व्यंकटरमण यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
TVK Vijay Rally Stampede : तमिळनाडू : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. विजय थलापती याची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र यामध्ये गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून कारवाईची मागणी केली जात आहे. या चेंगराचेंगरीमध्ये 36 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 16 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणावर तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
विजय थलापतीच्या सभेत गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरीत जवळपास 36 जणांचा मृत्यू झाला. यात आठ बालकं आणि 16 महिलांचा समावेश आहे. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय यांचं भाषण सुरू होतं, त्यावेळी जमावाने व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली. यात पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक आणि बालके बेशुद्ध पडली. विजय यांनी पोलिसांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केले.तसेच व्यासपीठावरून त्यांनी पाण्याच्या बाटल्याही पुरवल्या. त्यानंतर त्यांनी भाषण थांबवलं. मात्र दुर्घटनेची चर्चा देशभर सुरु असून यावर आता पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकरणावर तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी माध्यमांसमोर तमिळनाडूमधील या चेंगराचेंगरी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ही अत्यंत दु:खद घटना आहे. या घटनेनंतर मी पोलिसांनी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला आहे. याआधी टीव्हीकेच्या रॅलीमध्ये कमी गर्दी असायची. परंतु यंदा अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमले. आयोजकांनी करूर इथं एका मोठ्या मैदानाची मागणी केली होती आणि जवळपास 10 हजार लोक जमण्याची अपेक्षा होती. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा झाले. ज्याठिकाणी विजय जनतेला संबोधित करणार होते, तिथे 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते,” अशी माहिती डीजीपी यांनी दिली.
VIDEO | Tamil Nadu: Stampede-like situation was witnessed, and many persons, including a few children, fainted in Karur as a massive crowd gathered for TVK chief and actor Vijay’s speech. The fainted persons were rushed to nearby hospitals in ambulances, and some of them are… pic.twitter.com/DFGH1oH0BI — Press Trust of India (@PTI_News) September 27, 2025
पुढे ते म्हणाले की, जी. वेंकटरमण यांनी सांगितलं की सभेसाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. परंतु सकाळी 11 वाजल्यापासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. जेव्हा विजय संध्यकाळी 7.40 वाजता त्याठिकाणी पोहोचले, तेव्हा जमाव तिथं जेवण आणि पाण्याच्या सोयींविना तासनतास प्रतिक्षा करत होता. विजय यांनी स्वत: पोलिसांच्या भूमिकेचं कौतुक केलं. परंतु गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी यावर त्यांनी भर दिला. या दु:खद घटनेमागील कारणं चौकशीनंतरच कळू शकतील. त्यासाठी एक सदस्यीय आयोग आधीच स्थापन करण्यात आला आहे”, अशी माहिती तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजयच्या रॅलीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दहा लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, तामिळनाडूतील करूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली ही दुःखद घटना अत्यंत दुःखद आहे. या प्रसंगी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात मी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो, अशा भावना पंतप्रधान मोजी यांनी व्यक्त केल्या आहेत.