मुंबई : कोरोनामुळे(Corona) हॉटेल(Hotel) आणि रेस्टॉरंटचे(Restaurants) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .
[read_also content=”प्रियकराने लग्नाला नकार मिळाल्यावर केली आत्महत्या,स्थानिकांनी चक्क मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न https://www.navarashtra.com/latest-news/lover-commits-suicide-girl-get-married-with-dead-body-in-west-bengal-nrsr-135926.html”]
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले की, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.लॉकडाऊन काळात मोठे नुकसान झाले आहे , त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाण्याची परवानगी
देण्यासोबतच कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी
मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .
तसेच एफ एल ३ परवाना आणि चालू वर्षाच्या शुल्कात कपात केली जावी, पालिकेचे परवाने, परवानग्या व एनओसी यांना वर्षभर मुदतवाढ द्यावी , लॉकडाऊन काळातील मालमत्ता कर माफ करावा, अशीही विनंती केली आहे.
लॉकडाऊनमुळे हॉटेल , रेस्टॉरंटची अवस्था बिकट झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट वाचविण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे . वेळेत उपाययोजना न केल्यास हे क्षेत्र वाचविणेही कठीण होईल.