आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विठ्ठल दर्शन रांगेची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे, प्रोटोकॉल बाजूला ठेवत त्यांनी बुलेटवरून दर्शनरांगे पर्यंत पोहोचून नियोजनाची माहिती घेतली.






